शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नंदुरबारात स्वच्छ सव्र्हेक्षणाच्या कार्यशाळेत वाद-विवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत पालिकेने घेतलेल्या कार्यशाळेत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी केले. स्वच्छ भारत, स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत बुधवारी नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, स्वच्छ महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत पालिकेने घेतलेल्या कार्यशाळेत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी केले. स्वच्छ भारत, स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत बुधवारी नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कार्यशाळेचे संचालक डॉ.उदय टेकाळे, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, मुख्याधिकारी गणेश गिरी, राहुल वाघ, डॉ.अजरून लालचंदाणी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत स्वच्छ सव्र्हेक्षण करणेकामी प्रश्नांची माहिती व नगरपरिषदेने केलेल्या कार्यवाहीबाबत नगरसेवक, सेवाभावी संस्था, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नागरिकांना यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबत सजग असले पाहिजे. पालिकेने देखील सर्वच भागात नियमित स्वच्छता होईल यादृष्टीने लक्ष दिले पाहिजे अशा सुचना केल्या.उदय टेकाळे यांनी स्वच्छ सव्र्हेक्षणासंदर्भातील माहिती दिली. याची तपासणी करतांना स्वच्छता विभागामार्फत पुरविण्यात येणा:या सेवांची कागदोपत्री तपासणी, तसेच प्रत्यक्षात फिल्डवर जावून पहाणी, नागरिकांचा प्रतिसाद अशा तीन भागात सव्र्हेक्षण केले जाणार असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वानी प्रय} करण्याचे आवाहन केले.दरम्यान, कार्यशाळेत स्वच्छता सव्र्हेक्षणाबाबतची प्रश्नावली आणि त्याचे उत्तर याबाबत माहिती वाचून दाखविण्यात येत होती. त्यावर भाजपचे नगरपालिकेतील प्रतोद प्रवीण चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी मनोगत व्यक्त करू देण्याची मागणी केली. त्यावरून वादविवाद झाला. वाद वाढत चालल्याचे पाहून कार्यशाळा आटोपती घेण्यात आली. विरोधी पक्षाचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेविका संगिता सोनवणे यांनीदेखील काही बाबींवर आक्षेप घेतला.याबाबत प्रवीण चौधरी यांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले, स्वच्छ सव्र्हेक्षण करतांना वास्तव बाजू पुढे आली पाहिजे. अनेक भागात आजही अस्वच्छता आहे. अनेक ठिकाणी वेळेवर कचरा उचलला जात नाही. उघडय़ावर शौचाला जावे लागते. त्यामुळे केवळ कागदोपत्री सव्र्हेक्षण न करता वास्तवातून ते झाले पाहिजे. केवळ पुरस्कार घेण्यासाठी हे अभियान नको. स्वच्छतेसंदर्भातील काही योजनांचीही चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.