शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विविध आजारांनी दीड हजार बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:12 IST

दोन वर्षातील स्थिती : उपचारांची सोय असूनही दुर्लक्ष

नंदुरबार : आरोग्य सुविधा आणि शासकीय योजनांचा रतीब लागणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात विविध आजारांमुळे गेल्या दोन वर्षात शून्य ते पाच वर्ष वयाची १ हजार ७२७ बालके दगावल्याचा अहवाल आहे़ यातील निम्मी बालके ही शहरी भागात उपचार घेताना दगावल्याची माहिती असून लागण झालेले आजार हे बरे होण्यासारखेच होते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे़१ जिल्हा, दोन उपजिल्हा आणि ११ ग्रामीण रुग्णालये, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९० उपकेंद्रांंसह सातपुड्यात बोटीचे दवाखाने, फिरते पथकांद्वारे आरोग्य सेवा दिली जाते़ कुपोषणामुळे संवेदनशील असल्याने जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांसाठी सतत मोहिमा राबवल्या जातात़ यातून कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याच्या आकडेवारीतील तफावत नेहमी चर्चेचा विषय ठरत असल्याने हा मुद्दा कायम आहे़ परंतू जिल्ह्यात या व्यतिरिक्त विविध आजारांनी होणारे बालकांचे मृत्यू चिंतेचा विषय असून वेळीच उपचार न मिळणे व आजारांबाबत जनजागृतीचा अभाव यातून बालकांना प्राण गमवावे लागल्याचे २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात समोर आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे़ २०१८-१९ या वर्षात न्यूमोनिया या आजाराने ८५, अवेळी जन्म आणि वजनात कमी यातून १४८, अतीसार आणि इतर आजारातून ६, जखमेत जंतूसंसगार्गतून ११६, श्वसनाच्या विकारातून ११६, जन्मजात विकृतीतून ३१, श्वसनाच्या त्रासातून १०१, अपघातातून जखमी झालेले १०, पाण्यात बुडाल्याने १३, विषबाधा आणि सर्पदंशाने ७, अकस्मात ५, मेंदूज्वराने ११ तर इतर अनोळखी आजारांनी २१५ अशा एकूण ८४४ बालकांचा मृत्यू झाला़ शून्य ते ५ वर्ष वयोगटातील ही बालके आहेत़ तालुकानिहाय आकडेवारीनुसार नंदुरबार ५०, नवापूर ४४, तळोदा ११, शहादा ४४, अक्कलकुवा १२६ तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक १५१ बालकांचा बळी गेला आहे़ ग्रामीण भागातून शहरी भागात रुग्णालयात उपचार सुरु असताना ४१८ तर ग्रामीण भागात घरीच बळी गेलेल्या बालकांची संख्या ही ४२६ आहे़ एकाच वर्षात ८४४ बालकांचा बळी गेल्याने या आरोग्य सेवेबाबतचे गांभिर्य वाढले आहे़ २०१७-१८ या वर्षातही हीच गत असल्याचे चित्र आहे़ या वर्षात न्यूमोनिया ७०, कमी वजनामुळे १८४, अतीसार १४, जखमेतील जंतूसंसर्गामुळे १३९, श्वसन विकारामुळे १०८, विकृतीने ५०, श्वसनाच्या त्रासाने ७५, अपघातात ११, बुडून ६, सर्पदंश आणि विषबाधेने १५, मेंदूज्वराने ९, अकस्मात ८ तर इतर आजारांनी १९४ अशा अशा ८८३ बालकांचा मृत्यू झाला होता़