शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

नंदुरबारात विविध आजारांनी दीड हजार बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:12 IST

दोन वर्षातील स्थिती : उपचारांची सोय असूनही दुर्लक्ष

नंदुरबार : आरोग्य सुविधा आणि शासकीय योजनांचा रतीब लागणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात विविध आजारांमुळे गेल्या दोन वर्षात शून्य ते पाच वर्ष वयाची १ हजार ७२७ बालके दगावल्याचा अहवाल आहे़ यातील निम्मी बालके ही शहरी भागात उपचार घेताना दगावल्याची माहिती असून लागण झालेले आजार हे बरे होण्यासारखेच होते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे़१ जिल्हा, दोन उपजिल्हा आणि ११ ग्रामीण रुग्णालये, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९० उपकेंद्रांंसह सातपुड्यात बोटीचे दवाखाने, फिरते पथकांद्वारे आरोग्य सेवा दिली जाते़ कुपोषणामुळे संवेदनशील असल्याने जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांसाठी सतत मोहिमा राबवल्या जातात़ यातून कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याच्या आकडेवारीतील तफावत नेहमी चर्चेचा विषय ठरत असल्याने हा मुद्दा कायम आहे़ परंतू जिल्ह्यात या व्यतिरिक्त विविध आजारांनी होणारे बालकांचे मृत्यू चिंतेचा विषय असून वेळीच उपचार न मिळणे व आजारांबाबत जनजागृतीचा अभाव यातून बालकांना प्राण गमवावे लागल्याचे २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात समोर आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे़ २०१८-१९ या वर्षात न्यूमोनिया या आजाराने ८५, अवेळी जन्म आणि वजनात कमी यातून १४८, अतीसार आणि इतर आजारातून ६, जखमेत जंतूसंसगार्गतून ११६, श्वसनाच्या विकारातून ११६, जन्मजात विकृतीतून ३१, श्वसनाच्या त्रासातून १०१, अपघातातून जखमी झालेले १०, पाण्यात बुडाल्याने १३, विषबाधा आणि सर्पदंशाने ७, अकस्मात ५, मेंदूज्वराने ११ तर इतर अनोळखी आजारांनी २१५ अशा एकूण ८४४ बालकांचा मृत्यू झाला़ शून्य ते ५ वर्ष वयोगटातील ही बालके आहेत़ तालुकानिहाय आकडेवारीनुसार नंदुरबार ५०, नवापूर ४४, तळोदा ११, शहादा ४४, अक्कलकुवा १२६ तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक १५१ बालकांचा बळी गेला आहे़ ग्रामीण भागातून शहरी भागात रुग्णालयात उपचार सुरु असताना ४१८ तर ग्रामीण भागात घरीच बळी गेलेल्या बालकांची संख्या ही ४२६ आहे़ एकाच वर्षात ८४४ बालकांचा बळी गेल्याने या आरोग्य सेवेबाबतचे गांभिर्य वाढले आहे़ २०१७-१८ या वर्षातही हीच गत असल्याचे चित्र आहे़ या वर्षात न्यूमोनिया ७०, कमी वजनामुळे १८४, अतीसार १४, जखमेतील जंतूसंसर्गामुळे १३९, श्वसन विकारामुळे १०८, विकृतीने ५०, श्वसनाच्या त्रासाने ७५, अपघातात ११, बुडून ६, सर्पदंश आणि विषबाधेने १५, मेंदूज्वराने ९, अकस्मात ८ तर इतर आजारांनी १९४ अशा अशा ८८३ बालकांचा मृत्यू झाला होता़