शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धुरखेड्यात मृत कावळे आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील धुरखेडा येथे वीस कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी हा प्रकार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील धुरखेडा येथे वीस कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी हा प्रकार समोर आला. या  कावळ्यांचा मृत्यू विषारी अन्न खाल्ल्याने किंवा बर्ड फ्ल्यूने झाला किंवा कसे याबाबत चर्चांना उधाण आले आहे.  वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत कावळ्यांचे पार्थिव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. नवापूर येथे बर्ड फल्यू समाेर आल्याने युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास धुरखेडा  येथे  शेताजवळ व परिसरात कावळे मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर सरपंच गणेश चौधरी वनविभागाला माहिती दिली. वनपाल दीपक परदेशी,  सुभाष मुकडे,  डी. डी .पाटील,  वन्यजीव  संस्थेचे  सागर निकुंभे यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी  २०  कावळे मृत अवस्थेत आढळून आले.  पथकाने मृत कावळे गोळा करुन तपासणीसाठी मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवले आहे. तपासणी अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. एकाचवेळी २० कावळे मृत आढळून आल्याने गावात भितीचे वातावरण आहे.  वन विभागामार्फत बुधवारी  संपूर्ण परिसरात तपासणी होणार असून आणखी काही कावळ्यांचे मृतदेह परिसरात आढळून येतात का याबाबत विशेष पाहणी केली जाणार आहे.  तालुक्यात बर्ड फ्ल्यू ची लागण नाही. मात्र घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. येत्या आठवड्यात  प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सचिन खुणे यांनी दिली आहे.