शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तापी नदीवरील प्रकाशा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:10 IST

ठिकठिकाणी खड्डे व लोखंडी सळ्या वर आल्याने पुलाला तडे

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : तापी नदीवर येथे असलेल्या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळ्या वर आल्याने वाहनांचे नुकसान होत असून दुचाकी वाहनधारकांसाठी ते धोकेदायक ठरत आहे. लोखंडी सळ्या वर आल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने अवजड वाहनांमुळे पुलाला हादरा बसत असून काही ठिकाणी तडेही जात आहेत.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा गावाजवळ तापी नदीवरील पूल जिल्ह्यातील दळणवळणासाठी मुख्य मानला जातो. या पुलावरुन दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मात्र पुलावरील रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने           दुर्लक्ष केले आहे. या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जागोजागी लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्यांमुळे वाहनांना हादरा बसतो व अपघातही होत आहेत. दीड वर्षापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. हे काम महिनाभर सुरू होते. या कामात प्रामुख्याने पुलाच्या खाली बेअरींग टाकणे व पुलाच्या जॉईंटचे काम करण्यात आले होते. पुलावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये अवजड वाहनाचे चाक पडल्यावर पुलाला हादरा बसतो व जॉईंटच्या ठिकाणी तडे पडत आहेत. दोन ते तीन ठिकाणी असे तडे गेल्याने पुलाला मोठा धोका निर्माण होत आहे. या खड्डय़ांमधून लोखंडी सळ्या बाहेर निघण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे अपघात होत आहेत.प्रकाशा येथे रविवारी विसरवाडी-खेतिया या राष्ट्रीय महामार्गाच्या दुस:या टप्प्याचे म्हणजे कोळदा ते खेतियार्पयतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात वि.का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिका:यांना पुलावरील खड्डय़ांबाबत विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी सांगितले की, दीड वर्षापूर्वी पुलाचे काम झाल्याचे सांगितले. मात्र हे उत्तर दिशाभूल करणारे आहे. कारण दीड वर्षापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे फक्त बेअरींग टाकणे व जॉईंट दुरुस्तीचे काम झाले होते. दुरुस्तीचे पूर्ण            काम झाल्यावर डांबरीकरणाचा एक लेअर टाकणे गरजेचे होते. मात्र ज्या कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता त्यांनी हे काम केले नाही. परिणामी पुलावर खड्डे पडून तडेही जात आहेत. हा पूल ज्या विभागाच्या अखत्यारीत असेल त्या अधिका:यांनी पुलावरील रस्त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे  आहे अन्यथा पुलाला हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.