शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

तापी नदीवरील प्रकाशा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:10 IST

ठिकठिकाणी खड्डे व लोखंडी सळ्या वर आल्याने पुलाला तडे

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : तापी नदीवर येथे असलेल्या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळ्या वर आल्याने वाहनांचे नुकसान होत असून दुचाकी वाहनधारकांसाठी ते धोकेदायक ठरत आहे. लोखंडी सळ्या वर आल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने अवजड वाहनांमुळे पुलाला हादरा बसत असून काही ठिकाणी तडेही जात आहेत.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा गावाजवळ तापी नदीवरील पूल जिल्ह्यातील दळणवळणासाठी मुख्य मानला जातो. या पुलावरुन दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मात्र पुलावरील रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने           दुर्लक्ष केले आहे. या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जागोजागी लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्यांमुळे वाहनांना हादरा बसतो व अपघातही होत आहेत. दीड वर्षापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. हे काम महिनाभर सुरू होते. या कामात प्रामुख्याने पुलाच्या खाली बेअरींग टाकणे व पुलाच्या जॉईंटचे काम करण्यात आले होते. पुलावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये अवजड वाहनाचे चाक पडल्यावर पुलाला हादरा बसतो व जॉईंटच्या ठिकाणी तडे पडत आहेत. दोन ते तीन ठिकाणी असे तडे गेल्याने पुलाला मोठा धोका निर्माण होत आहे. या खड्डय़ांमधून लोखंडी सळ्या बाहेर निघण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे अपघात होत आहेत.प्रकाशा येथे रविवारी विसरवाडी-खेतिया या राष्ट्रीय महामार्गाच्या दुस:या टप्प्याचे म्हणजे कोळदा ते खेतियार्पयतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात वि.का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिका:यांना पुलावरील खड्डय़ांबाबत विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी सांगितले की, दीड वर्षापूर्वी पुलाचे काम झाल्याचे सांगितले. मात्र हे उत्तर दिशाभूल करणारे आहे. कारण दीड वर्षापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे फक्त बेअरींग टाकणे व जॉईंट दुरुस्तीचे काम झाले होते. दुरुस्तीचे पूर्ण            काम झाल्यावर डांबरीकरणाचा एक लेअर टाकणे गरजेचे होते. मात्र ज्या कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता त्यांनी हे काम केले नाही. परिणामी पुलावर खड्डे पडून तडेही जात आहेत. हा पूल ज्या विभागाच्या अखत्यारीत असेल त्या अधिका:यांनी पुलावरील रस्त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे  आहे अन्यथा पुलाला हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.