शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

६२७ घरांचे २६ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील ६२७ घरांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने नुकतेच पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील ६२७ घरांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने नुकतेच पूर्ण केले आहे. या वादळात २६ लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. आता नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतिक्षा लागून आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.दरम्यान तºहावद येथील प्रकल्पग्रस्तांचेही गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या पावसात नुकसान झाले होते. परंतु शासनाच्या नियमात त्यांचे नुकसान बसत नसल्यामुळे या विस्थापितांना नुकसानीपासून वंचित राहावे लागत असल्याचे म्हटले जात आहे.गेल्या ११ जून रोजी जोरदार वादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील मोड, कळमसरे, तºहावद, रेवानगर, भवर, बोरद, खरवड या गावामधील रहिवाशांच्या घरांचे पत्रे, छप्पर उडून प्रचंड नुकसान झाले होते. काही गावांमध्ये घरांना मोठा फटका बसला होता. साहजिकच घरांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रत्यक्ष गावांमध्ये जावून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात साधारण ६२७ घरांचे या वादळी पावसामुळे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यात रहिवाशांचे २६ लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तसा अहवालही प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. आता नुकसानग्रस्तांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा लागून आहे. कारण गेल्या चार महिन्यांपासून राज्य शासनाच्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागातील जनतेपुढे रोजगाराचा प्रश्न होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या धोरणात शासनाने शिथिलता आणल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. साहजिकच त्यातून जशी-तशी पोटाची खळगी भरली जात आहे. त्यावरच कुटुंबांची सध्या गुजरान केली जात आहे, असे असले तरी संसार उघडा पडू नये म्हणून नुकसानग्रस्तांनी उधार, उसणवारी व व्याजाने पैसे घेऊन घरांची दुरूस्ती करत पुन्हा संसार नव्याने उभा केला आहे. मात्र घेतलेले पैसे देण्याची चिंता आता सतावत असल्याची व्यथाही काही नुकसानग्रस्तांनी बोलून दाखविली आहे. आधीच पुरेसा कामधंदा नसल्यामुळे उधार उसनवारीचे प्रपंच चालविला होता. त्यानंतर आसमानी संकटाने घरांचे मोठे नुकसान केल्याने चिंतेत भरच पडली आहे. त्यामुळे आम्हा गरीब नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तरी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे. कारण तत्काळ शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांीन दिले आहे.गेल्या १० दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात मोड १०६, खरवड १०४, कळमसरे ४५, तºहावद ३९, भवर २५, बोरद १०, रेवानगर पुनर्वसन आठ या प्रमाणे गावनिहाय घरांचे नुकसानीचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. असे असले तरी तळोदा तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसामुळे सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन वसाहतींमधील १५ घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्यामुळे या विस्थापितांचे घरांचे नुसानी बरोबर अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. त्यांनी वर्षभरासाठी साठवलेले धान्यही पाण्यात वाहून गेल्याचे विस्थापितांनी सांगितले. महसूल प्रशासनाने त्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी शासनाच्या पर्जन्य वृष्टीच्या नियमात बसत नसल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक शासकीय यंत्रणांच्या उदासिन धोरणामुळे त्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. असा बाधितांचा आरोप आहे. वसाहतींमध्ये ज्या गटारी केल्या आहेत. त्यांची एकदाही साफ-सफाई करण्यात आलेली नाही. शिवाय त्यांची खोली व रूंदीदेखील कमी आहे. त्यामुळे त्या आधीच गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे गटारींमधील पाणी पुढे न सरकता ते थेट घरांमध्येच शिरले होते. वास्तविक पावसाळ्यापूर्वी नाला खोलीकरणाबरोबरच गटारींची स्वच्छता, डागडुजी करण्याची मागणी वसाहतीतील रहिवाशांनी सातत्याने केली होती. मात्र त्याकडे संबंधीत यंत्रणांनी साफ दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे गेल्या वर्षीदेखील नाल्याच्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरले होते. तरीही प्रशासनाने यातून धडा घेतलेला नाही. आता म्हणतात शासनाच्या मदती निकषात बसत नाही, असा संतप्त सवालही बाधितांनी उपस्थित केला आहे.नुकत्याच झालेल्या पावसामुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. पाण्यामुळे घरातील वस्तु व धान्यदेखील खराब झाले आहे. तलाठ्यांनी पंचनामा केला आहे. आता तत्काळ आधार देण्यासाठी आर्थिक मदत मिळायला पाहिजे. पावसाळ्यात नेहमीच गटारी अथवा पुराच्या पाण्याची समस्या उद्भवत असते. परंतु प्रशासन उपाययोजनांबाबत काहीच करायला तयार नाही. त्यामुळे वैतागलो आहोत.-शामजी पाडवी, प्रकल्पग्रस्त,तºहावद पुनर्वसन, ता.तळोदा