शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

आंबा व चारोळीसह घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील राणीपूर परिसरासह साबलापाणी, नंबरपाडा व नागझिरी परिसरात मान्सूनपूर्व जोरदार वादळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील राणीपूर परिसरासह साबलापाणी, नंबरपाडा व नागझिरी परिसरात मान्सूनपूर्व जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे घरांसह आंबा व चारोळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी संबंधित गावांना भेटी देत कृषी विभागासह मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे तातडीने आदेश देण्यात आले आहेत.शहादा व धडगाव तालुक्यात गेल्या १५ दिवसात दोन ते तीन ठिकाणी पाऊस झाला. रविवारी सायंकाळी वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने साबलापाणी, नंबरपाडा व नागझरी परिसराला अक्षरश: झोडपून काढले. एक तासापेक्षा जास्तवेळ पाऊस झाल्याने नदी-नाल्यांमधून पाणी वाहत होते. यात नबरपाडा येथील जामसिंग सुलतान पावरा यांच्या दोन घराचे नुकसान झाले. साबलापाणी येथील अनेक घरांची छपरे उडाली. घरांमध्ये साठवलेला गुरांचा चारा पूर्णत: ओला झाल्याने चाºयाचे नुकसान झाले. दोन मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे.या वादळी पावसामुळे परिसरातील सुमारे २०० आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले असून कैºया जमिनीवर पडून खराब झाल्या. साठवलेल्या चारोळीचेही नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांना आपल्या वस्तू व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मिरसिंग शंकर पावरा यांनी दहा-बारा वर्षापूर्वी हापूस व राजापुरी आंब्याची रोपे रत्नागिरीहून आणली होती. मेहनत करून झाडांना वाढवले होते. मात्र या झाडांवरील कैºया तुटून पडल्या तर काही झाडे मुळासकट जमिनीवर कोलमडून पडले. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व राणीपूर भागात रविवारी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आमदार राजेश पाडवी यांनी केली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई अदा करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. या पावसामुळे व गारपिटीमुळे अनेकांचे नुकसान झाले असून सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त गावातील राणीपूर, नागझिरी, नंबरपाडा, साबलापाणी, आदाºयापाडा येथे नुकसानीची पाहणी आमदार पाडवी. या वेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, वीरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, सुकलाल रावताळे, सचिन पावरा, कमल पावरा, हितेश मेडेकर, रामदास पावरा व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी येथील कृषी विद्यापीठातून हापूस व राजापुरी या आंब्यांचे दहा ते बारा वर्षापूर्वी रोपे आणली होती. परिसरातील लोकांना चांगल्या दर्जाचे व स्वस्त आंबे देण्याची इच्छा होती. मात्र मान्सूनपूर्व पावसाने झाडे व आंबा फळाचे नुकसान केल्याने या फळांची चव आता लोकांना मिळणार नाही.-मेलसिंग शंकर पावरा, शेतकरी, साबलापाणी.