शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

केळीचे 200 घड कापून नुकसान

By admin | Updated: April 1, 2017 00:29 IST

कुढावद शिवारातील घटना : एक लाखाचे नुकसान, शेतमालकाच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांचा प्रय} फसला

शहादा : तालुक्यातील कुढावद शिवारात तीन एकर क्षेत्रातील सुमारे  एक लाख रुपये किमतीचे 200 केळीचे घड कापून नुकसान केल्याची घटना घडली. मात्र संबंधित शेतमालकाच्या सतर्कतेमुळे हे            घड चोरून नेण्याचा चोरटय़ांचा   प्रय}  फसला. पोलिसांनी  चोरटय़ांचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.याबाबत वृत्त असे की, कुढावद, ता.शहादा येथील नरोत्तम रतिलाल पाटील व भरत रतिलाल पाटील यांनी पिंपळोद-कुढावद रस्त्यालगत असलेल्या शेतात तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. त्यांच्या केळीचे घड तयार झाले असून दोन दिवसांपूर्वीच एका व्यापा:याशी माल विक्रीचा व्यवहार झाला होता. एक-दोन दिवसात केळीचे घड तोडण्याबाबत व्यापारी व शेतकरी यांच्यात ठरले होते. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नरोत्तम पाटील हे शेतातून घरी आले. त्यानंतर रात्री नऊ वाजता वीजपुरवठा सुरू होतो म्हणून पिकांना पाणी देण्यासाठी ते परत शेतात आले. पाटील हे साडे नऊ वाजेच्या सुमारास लाईट व मोटार सुरू करून पिकांना पाणी देत होते. त्यावेळी त्यांनी झाडांवरील केळीचे घड कापल्याचे निदर्शनास आले. शेतातून          रस्त्यार्पयत सुमारे 200 पेक्षा जास्त केळीचे घड कापून ठेवलेले होते. सध्या केळीला 1500 रुपयांचा भाव असल्याने सुमारे एक लाख रुपये किमतीचा हा माल होता. एक-दीड तासातच 200 केळीचे घड कापून रस्त्यावर व्यवस्थित ठेवण्यात आलेले होते. त्यावरून हे चोर 10 ते 15         जण असण्याची शक्यता आहे.  चोरांनी पद्धतशीरपणे नियोजन केले होते. हे केळीचे घड वाहून नेण्यासाठी वाहनही आणले असावे, असा अंदाज आहे.शहादा तालुक्यात शेतातून शेती साहित्याची चोरी व तयार झालेला शेतमाल चोरून नेण्याच्या घटना ह्या कायमच्या झाल्या आहेत. याबाबत शेतक:यांनी पोलिसांना वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही या चोरटय़ांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कुढावद येथे केळीचे घड कापून चोरून नेण्याचा चोरांचा प्रय} शेतक:याच्या सतर्कतेमुळे फसला असला तरी या चोरटय़ांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.    शहादा तालुक्यातील शेतातून शेती साहित्याची चोरी, शेतमालाची चोरी या घटना नेहमीच घडतात. म्हसावद-पिंप्री परिसरात तर चक्क विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरी करताना चोरटय़ांना शेतक:यांनी रंगेहात पकडले होते. शेतमालाची व शेती साहित्याची चोरी करण्यासाठी चोरटय़ांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. गुरुवारी रात्री कुढावद शिवारातील केळीच्या शेतातून सुमारे 200 केळीचे घड कापून ते रस्त्यार्पयत आणून ठेवण्यात आले होते. वाहनाद्वारे हे केळीचे घड लंपास करण्याचा चोरटय़ांचा प्रय} असावा. मात्र संबंधित शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात आल्याने चोरटय़ांचा हा प्रयत्न फसला असला तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी चोरटय़ांचा वेळीच बंदोबस्त करण्याची अपेक्षा  त्रस्त शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.