शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

किराणा खरेदीसाठी पुन्हा उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या लक्षणिय असल्याचे दिसून आले. शहरात विनाकारण फिरणाºयांवर करायचे काय, तसेच गर्दी कशी कमी होणार असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.शहरात कोरोनाचे चार रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनमधील सर्व प्रतिष्ठाने बंद केले होते. रविवारपासून नागरिकांना अत्यावश्यक वस्तू, किराणा माल व दूध खरेदी करण्यासाठी दररोज सकाळी आठ ते बारा या कालावधीत संचार बंदीमधून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र याच काळात शहरात सर्वाधिक गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सींग या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.सर्वाधिक जास्त गर्दी किराणा दुकानांमध्ये दिसून येत असून, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक चेहºयाला मास्क लावण्याचे सौजन्य दाखवत नाही. दररोज सकाळी चार तास किराणा दुकान उघडे राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी खरेदीला येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी करत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष म्हणजे किराणा दुकानातील अनेक साहित्याचे दर वाढलेले आहेत.दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरात विनाकारण भटकण्याची जणूकाही स्पर्धाच लागली आहे. नागरिक मोटरसायकल घेऊन शहरात मनसोक्त भटकंती करत आहे. परिणामी शहरात सलग दुसºया दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवा असे असे आवाहन केले जात असले तरी याचा फारसा परिणाम गर्दीवर जाणवत नव्हता. याउलट पोलिसांची गाडी गेली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होत होती. विशेष म्हणजे कन्टेन्मेंट झोनमधील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने सोमवारी खुली करण्यात आल्याने याच भागात गर्दीचे सर्वाधिक प्रमाण होते.

प्रशासनाच्यावतीने शहरातील पाच किलोमीटर अंतरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना व शेतीविषयक कामासाठी पेट्रोल डिझेल देण्यासाठी सूट असली तरी शहरात भटकंती करणाºया मोटरसायकल स्वारांना सहजरित्या पेट्रोल कसे काय उपलब्ध होते हा संशोधनाचा विषय झाला आहे. प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तसेच विनाकारण शहरात फिरणाºयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.