शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

किराणा खरेदीसाठी पुन्हा उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या लक्षणिय असल्याचे दिसून आले. शहरात विनाकारण फिरणाºयांवर करायचे काय, तसेच गर्दी कशी कमी होणार असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.शहरात कोरोनाचे चार रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनमधील सर्व प्रतिष्ठाने बंद केले होते. रविवारपासून नागरिकांना अत्यावश्यक वस्तू, किराणा माल व दूध खरेदी करण्यासाठी दररोज सकाळी आठ ते बारा या कालावधीत संचार बंदीमधून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र याच काळात शहरात सर्वाधिक गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सींग या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.सर्वाधिक जास्त गर्दी किराणा दुकानांमध्ये दिसून येत असून, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक चेहºयाला मास्क लावण्याचे सौजन्य दाखवत नाही. दररोज सकाळी चार तास किराणा दुकान उघडे राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी खरेदीला येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी करत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष म्हणजे किराणा दुकानातील अनेक साहित्याचे दर वाढलेले आहेत.दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरात विनाकारण भटकण्याची जणूकाही स्पर्धाच लागली आहे. नागरिक मोटरसायकल घेऊन शहरात मनसोक्त भटकंती करत आहे. परिणामी शहरात सलग दुसºया दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवा असे असे आवाहन केले जात असले तरी याचा फारसा परिणाम गर्दीवर जाणवत नव्हता. याउलट पोलिसांची गाडी गेली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होत होती. विशेष म्हणजे कन्टेन्मेंट झोनमधील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने सोमवारी खुली करण्यात आल्याने याच भागात गर्दीचे सर्वाधिक प्रमाण होते.

प्रशासनाच्यावतीने शहरातील पाच किलोमीटर अंतरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना व शेतीविषयक कामासाठी पेट्रोल डिझेल देण्यासाठी सूट असली तरी शहरात भटकंती करणाºया मोटरसायकल स्वारांना सहजरित्या पेट्रोल कसे काय उपलब्ध होते हा संशोधनाचा विषय झाला आहे. प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तसेच विनाकारण शहरात फिरणाºयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.