शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

लॉकडाऊन संपताच शहरांमध्ये गर्दी ‘अप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/शहादा/कोठार/नवापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखला जावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० जुलैपर्यंत चार शहरे लॉकडाऊन करण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/शहादा/कोठार/नवापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखला जावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० जुलैपर्यंत चार शहरे लॉकडाऊन करण्याचे जाहिर केले होते़ यानुसार गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन सुरू होते़ शुक्रवारचा दिवस उजाडल्यावर लॉकडाऊन संपुष्टात आले असून सकाळी आठ वाजेपासूनच बाजारात गर्दी मावत नसल्याचे चित्र नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर शहरात दिसून आले़नंदुरबारलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आठ दिवस वैद्यकीय सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने शहर पूर्णपणे बंद होते़ कोणत्याही प्रकारचे व्यवसाय सुरू नसल्याने गल्लोगल्ली शुकशुकाट होता़ शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून शहरातील व्यवहार सुरू झाले़ यात प्रारंभी दुग्धव्यवसाय करणारे दिसून येत होते़ मध्यरात्रीच लॉकडाऊनचा कालावधी संपल्याने बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यात आले़ यातून तालुक्यासह लगतच्या गुजरात राज्यातील व्यापारी भाजीपाला घेऊन सकाळी रवाना झाले़ आठ दिवस भाजीपाला मिळाला नसल्याने अनेकांनी सात वाजेपासूनच बाजारात भेटी देणे सुरू केले होते़ यातून हाट दरवाजा, नेहरू चौक, बाजार समिती परिसर, अंधारे चौक ते आमदार कार्यालय, सुभाष चौक परिसर आणि मंगळबाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची गर्दी झाली होती़ सकाळच्या प्रहरीच वाहने बाजारात येऊन लागल्याने १० वाजेनंतर वाहतूकीची कोंडी झाल्याचा प्रकार सुरू झाला़ नगरपालिका चौक ते शास्त्री मार्केट तसेच इतर भागात वाहने निघण्यास अडचणी येत असल्याचे दिसून आले़दरम्यान किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने तसेच विविध दुकाने सुरू झाल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती़ शहरातील सर्वच भागात झालेल्या गर्दीमुळे आठ दिवस लागू केलेल्या लॉकडाऊनवर पाणी फेरले गेल्याचे चित्र शहरात होते़तळोदासात दिवसांच्या लॉकडाऊन नंतर शुक्रवारी तळोदा शहरातील बाजारपेठ पूर्वरत सुरु झाली. शुक्रवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते़सकाळी शहरातील सर्व दुकाने व सर्व आस्थापना सुरू करण्यात आल्या़ आठवडे बाजाराचा दिवस असल्याने व्यावसायिकांनी सकाळीच आपल्या दुकाने उघण्याची तयारी करून ठेवली होती. सकाळी ९ वाजेपासून दुकाने उघडण्यास परवानगी असली तरी अनेक जण अगोदर दुकानामध्ये जाऊन साफसफाईची कामे केली व ग्राहकांसाठी ९ वाजेनंतर दुकाने खुली केलेली दिसून आली. ग्रामीण भागातून येणारे ग्राहक देखील आठ वाजेपासून बाजारात दाखल झाले होते़ दुकाने सुरू झाल्यावर काही किराणा दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. दुकानदारांकडून फिजिकल डिस्टनसिंगचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत होते़ मात्र ग्राहकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होत. भाजीपाला मार्केटमध्ये देखिल सकाळच्या सुमारास ग्रामिण भागातून आलेल्या नागरीकांची गर्दी होती़ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत महिला शहरात आल्या होत्या़ राखी खरेदीवर महिला व युवतींनी भर दिल्याचे दिवसभरात दिसून आले़ दुपारी एक वाजेनंतर मात्र ग्रामिण भागातील नागरिक गावाकडे परत गेले़ अनपेक्षित लॉकडानची धास्ती असल्याने जास्तीत जास्त जीवनावश्यक साधनसामग्री घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत होता. स्मारक चौकात बाहेर गावांतून येणारे तांदूळ, कांदा, लसूण, विक्री करणारे विक्रेते आठवडे बाजाराचा दिवस असूनही येऊ शकले नव्हते़ त्यामुळे आठवडा बाजारात नेहमी गजबजलेला असणाºया या परिसरात अपेक्षेप्रमाणे गर्दी दिसून आली नाही़ शहरातील बँका आणि शासकीय कार्यालयांमध्येही नागरिकांनी विविध कामांसाठी गर्दी केल्याचे दिसून आले़ सायंकाळच्या सुमारास शहरातील नागरीक भाजीपाला व अन्य खरेदीसाठी बाजारात बाहेर पडतांना दिसून आले.नवापूरशहरात शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठा गजबजल्याचे दिसून आले़ दरम्यान महिन्याच्या शेवटी स्वस्त धान्य दुकानांमधे धान्य उपलब्ध झाल्याने शहरातील सर्व रेशन दुकानांसमोर शिस्तबध्द रांगा होत्या. बँकाही आठ दिवसांपासून बंद राहिल्याने सोशियल डिस्टंसिंग ठेवून बॅकांसमोर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्यात. कोरोनाच्या संसगार्पासुन स्वत:चा बचाव करा, सॅनिटायझर व मास्कचा महत्तम वापर करुन शासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे पालन करा असे तहसिलदार सुनिता जºहाड गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.शहरातील विविध भागात दिवसभर गर्दी दिसून येत होती़ ग्रामीण भागातून नागरिक शहरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आल्याचे दिसून आले़