शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

अक्कलकुवा शहरातील गर्दी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

अक्कलकुवा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातत्याने होणारी गर्दी संसर्गासाठी ...

अक्कलकुवा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातत्याने होणारी गर्दी संसर्गासाठी कारणीभूत ठरत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. अक्कलकुवा शहरामध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असताना शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणी योग्य ते नियोजन स्थानिक प्रशासनाने करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. परंतु, असे असतानाही येथील मुख्य बाजारपेठेत दररोज तोबा गर्दी होत असल्याचे भयावह चित्र दिसत आहे. शहरातील सर्व ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तसेच गुरुवार ते रविवार कडक निर्बंध उठल्यानंतर सोमवार, मंगळवार यादिवशी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. दररोज होणारी ही गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाच्या परिसरामध्ये भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्याची अत्यंत गरज असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे रुग्ण अत्यल्प असताना याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्रपणे रिकाम्या मैदानांवर सामाजिक अंतर ठेवून भाजीपाल्याची दुकाने थाटण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण दररोज आढळत असतानाही भाजीपाला बाजारात दररोज होणारी गर्दी टाळण्यासाठी याकडे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील भाजीपाला बाजार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये थाटण्यासाठी तालुका प्रशासनाला त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शहरांमधील मुख्य भाजीपाला बाजारात दररोज भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग ग्राहकांमध्ये दिसून येत नसल्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्यास ही गर्दीदेखील कारणीभूत ठरू शकते, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, तरी तातडीने याबाबत प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.