शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हिरवाईने नटलेल्या ‘सातपुडय़ा’त पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वत रांगांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता सातपुडय़ातील पर्वतरांगा हिरवळीने नटल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वत रांगांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता सातपुडय़ातील पर्वतरांगा हिरवळीने नटल्या आहेत. त्यामुळे सातपुडय़ातील पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत. दरम्यान, पर्यटकांची गर्दी होत असली तरी त्यांच्यासाठी येथे पुरेशा सुविधा नसल्याने गैरसोय होत असून पर्यटन विभागाने लक्ष घालून सातपुडय़ातील पर्यटन स्थळे विकसीत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सातपुडा पर्वत रांगात पहिला पाऊस झाला की पर्वत रांगांवर गवत व नवीन झाडे-झुडुपे उगवतात. त्यामुळे  सातपुडय़ावर हिरवी चादर आच्छादली गेल्याचा भास होतो. याशिवाय पावसाने जोर पकडल्यानंतर चांदसैली, देवगोई, दहेल या घाट परिसरात दाट धुके पसरते. या सर्व बाबी पर्यटकांना खुणावत असून तरुणांसह अनेक पर्यटकांची पावले सातपुडय़ाकडे वळू लागली आहेत.  15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याने कोठार, माकड टेकडी, चांदसैली घाट या परिसरात सकाळपासून दाट धुके पहायला मिळत आहे. दमदार पावसामुळे यावर्षी सातपुडय़ातील कोरडय़ा पडलेल्या नद्या-नाले व धबधबेही खळाळून वाहू लागले आहेत. ही सर्व नयमरम्य दृष्य व निसर्गचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी सातपुडय़ाच्या कुशीत होत आहे.खबरदारी घेणे आवश्यकहिरवाईने नटलेला सातपुडा, दाट धुके, खळाळून वाहणारे धबधबे यासारखी अनेक नयनरम्य दृष्य पर्यटकांना आपल्या कॅमे:यात बंद करण्याचा मोह आवरता येत नाही. अनेक जण मित्र-परिवारासोबत फोटोग्राफीचा आनंदही घेतात. परंतु        हे सर्व करताना पर्यटकांनी        खबरदारी घेणेही अत्यावश्यक आहे. सेल्फीसाठी कोणत्याही प्रकारचा आतेताईपणा हा दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. चांदसैली घाट हा सर्वात धोकेदायक घाट आहे. अनेक तरुण पर्यटनासाठी मोटारसायकलने येतात. सातपुडा पर्वत रांगात ठिकठिकाणी नागमोडी वळणे व जीवघेण्या दरी आहेत. अशा ठिकाणी कोणतेही स्टंट करणे हे जीवघेणे ठरू शकते. नद्या-नाले व धबधबे याठिकाणीही पर्यटकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.सातपुडा पर्वत रांगात अनेक पर्यटनस्थळे असून पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतील अशी बरीच स्थळे कोठार ते धडगाव, अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान आहेत. अनेक स्थळे तर सह्याद्री व कोकणातील पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत. ‘व्ह्यू पाईंट’ म्हणून ती विकसित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी संरक्षक कठडे, मार्गदर्शक सूचना फलक, उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी पुरेसी जागा, छत आदी बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे सातपुडय़ातील पावसाळी पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीही होऊ शकते. त्यासाठी पर्यटन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.