शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हिरवाईने नटलेल्या ‘सातपुडय़ा’त पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वत रांगांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता सातपुडय़ातील पर्वतरांगा हिरवळीने नटल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वत रांगांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता सातपुडय़ातील पर्वतरांगा हिरवळीने नटल्या आहेत. त्यामुळे सातपुडय़ातील पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत. दरम्यान, पर्यटकांची गर्दी होत असली तरी त्यांच्यासाठी येथे पुरेशा सुविधा नसल्याने गैरसोय होत असून पर्यटन विभागाने लक्ष घालून सातपुडय़ातील पर्यटन स्थळे विकसीत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सातपुडा पर्वत रांगात पहिला पाऊस झाला की पर्वत रांगांवर गवत व नवीन झाडे-झुडुपे उगवतात. त्यामुळे  सातपुडय़ावर हिरवी चादर आच्छादली गेल्याचा भास होतो. याशिवाय पावसाने जोर पकडल्यानंतर चांदसैली, देवगोई, दहेल या घाट परिसरात दाट धुके पसरते. या सर्व बाबी पर्यटकांना खुणावत असून तरुणांसह अनेक पर्यटकांची पावले सातपुडय़ाकडे वळू लागली आहेत.  15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याने कोठार, माकड टेकडी, चांदसैली घाट या परिसरात सकाळपासून दाट धुके पहायला मिळत आहे. दमदार पावसामुळे यावर्षी सातपुडय़ातील कोरडय़ा पडलेल्या नद्या-नाले व धबधबेही खळाळून वाहू लागले आहेत. ही सर्व नयमरम्य दृष्य व निसर्गचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी सातपुडय़ाच्या कुशीत होत आहे.खबरदारी घेणे आवश्यकहिरवाईने नटलेला सातपुडा, दाट धुके, खळाळून वाहणारे धबधबे यासारखी अनेक नयनरम्य दृष्य पर्यटकांना आपल्या कॅमे:यात बंद करण्याचा मोह आवरता येत नाही. अनेक जण मित्र-परिवारासोबत फोटोग्राफीचा आनंदही घेतात. परंतु        हे सर्व करताना पर्यटकांनी        खबरदारी घेणेही अत्यावश्यक आहे. सेल्फीसाठी कोणत्याही प्रकारचा आतेताईपणा हा दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. चांदसैली घाट हा सर्वात धोकेदायक घाट आहे. अनेक तरुण पर्यटनासाठी मोटारसायकलने येतात. सातपुडा पर्वत रांगात ठिकठिकाणी नागमोडी वळणे व जीवघेण्या दरी आहेत. अशा ठिकाणी कोणतेही स्टंट करणे हे जीवघेणे ठरू शकते. नद्या-नाले व धबधबे याठिकाणीही पर्यटकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.सातपुडा पर्वत रांगात अनेक पर्यटनस्थळे असून पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतील अशी बरीच स्थळे कोठार ते धडगाव, अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान आहेत. अनेक स्थळे तर सह्याद्री व कोकणातील पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत. ‘व्ह्यू पाईंट’ म्हणून ती विकसित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी संरक्षक कठडे, मार्गदर्शक सूचना फलक, उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी पुरेसी जागा, छत आदी बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे सातपुडय़ातील पावसाळी पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीही होऊ शकते. त्यासाठी पर्यटन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.