शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीचे दोन लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६२ हजार ६७४ ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीचे दोन लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६२ हजार ६७४ व्यक्तींना पहिला डोस, तर ४१ हजार ६८६ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. चार महिन्यांत हा टप्पा पार करण्यात आला आहे. दरम्यान, आरटीपीसीआर स्वॅब तपासणी चाचण्यांचा देखील एक लाखाचा टप्पा पार झाला असून रॅपिड अँटिजन चाचण्यांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीला पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. प्रारंभाच्या दिवशी चार केंद्रांवर २६५ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले; नंतरच्या टप्प्यात कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर) आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्याने २२ एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला. पालकमंत्री पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले.

लसीकरणाची भीती घालविण्यासाठी प्रयत्न

नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ग्रामीण भागातील जनजागृतीसह लाभार्थ्यांच्या नोंदणीचे कामदेखील शिक्षकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी लोककला, स्थानिक भाषा, बैठका, घरोघरी भेटी, आदी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे.

आतापर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांना कुठलाही गंभीर त्रास झालेला नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

जिल्ह्यात १३ हजार ७२१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर सात हजार ७४९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. २२ हजार २२८ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला, तर ८९७८ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १४ हजार २८९ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे, तर ४५ वर्षांवरील एक लाख १२ हजार ४३६ व्यक्तींनी पहिला, तर २५ हजार १५९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

एकूण उद्दिष्टाच्या ११.४ टक्के लाभार्थ्यांनी पहिला, तर २.८६ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आज, शुक्रवारपासून दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेलादेखील अधिक गती देण्यात येणार आहे.

फिरत्या पथकांची नियुक्ती

नोंदणी झालेल्या गावांत लसीकरणासाठी फिरते पथक पाठवून शिबिरांच्या आयोजनाद्वारे लसीकरणाला गती देण्याचे यशस्वी ठरले आहेत.

यासाठी प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी दोन आणि अक्कलकुवा व धडगावसाठी चार वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली. आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

ग्रामस्तरावरील मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, आदींचा सहभागही महत्त्वाचा ठरला. चांगले काम करणाऱ्यांना गौरविले जात आहे.

असा झाला आरटीपीसीआर चाचणीचा लाखाचा टप्पा पार

जिल्ह्यात कोरोनाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात आरटीपीसीआर स्वॅब तपासणीची सोय नव्हती. त्यामुळे पुणे, नाशिक व धुळे येथून स्वॅब तपासणी केली जात होती. त्याला तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे संशयित व्यक्तीकडून इतरांना संक्रमणाची भीती राहत होती. ही बाब लक्षात घेता नंदुरबारात स्वतंत्र आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. त्या आधी प्रायोगिक तत्त्वावर ट्रूनेटद्वारे देखील स्वॅब तपासणी केली जात होती.