शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शहादा तालुक्यात वादळीवाऱ्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा गोमाई नदीला पूर आला आहे़ यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विंधन विहिरींची पातळी वाढणार आहे़शहादा शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यापासून समाधानकारक पाऊस झाल्याने नदी-नाले वाहत आहेत़ दरा मध्यम प्रकल्पासह इतर प्रकल्पांमध्ये पाणी साठा झाला आहे़ पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ यातून कापूस सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुसरी नदीला पूर आला आहे़ दरम्यान गुरुवारी पहाटे झालेल्या पावसामुळे गोमाई नदीला पूर आला होता़ तिखोरा पुलावरून नदीतील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले़ पुरात वाहून आलेली लाकडे गोळा करताना युवक याठिकाणी दिसून येत आहे़ बुधवारी रात्री उशिरापर्यंत गोमाई नदीत काही महिला भाविकांकडून दशा मातेचे विसर्जन करण्यात येत होते़बामखेडा परिसरात वादळी वारेबामखेडा परिसरात रात्री ११ वाजता वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ जून महिन्यात विश्रांतीनंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला होता. परंतु बुधवारी मध्यरात्री सलग १ तास वादळी वाºयासह बामखेडा, वडाळी, खैरवे, भडगाव मातकुट, बोराळा जयनगर, कोंडावळ, फेस, दोंदवाडा, हिंगणी, तोरखेडा आणि काकर्दा या गावांमध्ये केळी, पपई, मिरची, कापूस आदी पिकांचे नुकसान झाले आहे़ वादळ वाºयामुळे पिके आडवी पडली होती़ यात अर्जुन चौधरी, मनोज चौधरी, वसंत पटेल, यादव पाटील, रविंद्र रत्नपारखी यांच्या पपई आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे़ कृषी विभागाने या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी आहे़ बामखेडा येथील पपई उत्पादक शेतकºयाने शेतात साचलेले पाणी मोटारद्वारे उपसून बाहेर काढले होते़बामखेडा परिसरात वादळी वारेसारंगंखेडा आणि परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतामध्ये पाणी साचले आहे़ यामुळे काही पिके पाण्याखाली गेली आहेत़ पाणी साचून राहिल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे़ सपाटीवरच्या शिवारातील कापूस, पपई, मूग, सोयाबीन, तूर, उडीद आदी पिके पाण्याखाली गेली आहेत़ अती पाण्यामुळे पिके वाया जावू नयेत यासाठी शेतकºयांकडून पंप लावून शेतातून पाणी काढण्याचे काम गुरूवारी सकाळी सुरू करण्यात आले आहे़ सारंगखेडा परिसरातील पपईच्या शेतातून सकाळी डिझेल पंपाच्या साह्याने अति पपई वाया जावू नये यासाठी शेतकरी कसरत करत असल्याचे दिसून आले़ शेतातील पाणी नाल्यात टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते़ या पावसामुळे दिलासा मिळाला तरी नुकसानीमुळे शेतकºयांच्या समाधानावर विरजण पडले आहे़ परिसरातील बºयाच शेतांमध्ये कापसाला बोेंडे फूटू लागल्याचे दिसून आले होते़ या शेतांमध्येही दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले़