शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात वादळीवाऱ्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा गोमाई नदीला पूर आला आहे़ यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विंधन विहिरींची पातळी वाढणार आहे़शहादा शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यापासून समाधानकारक पाऊस झाल्याने नदी-नाले वाहत आहेत़ दरा मध्यम प्रकल्पासह इतर प्रकल्पांमध्ये पाणी साठा झाला आहे़ पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ यातून कापूस सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुसरी नदीला पूर आला आहे़ दरम्यान गुरुवारी पहाटे झालेल्या पावसामुळे गोमाई नदीला पूर आला होता़ तिखोरा पुलावरून नदीतील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले़ पुरात वाहून आलेली लाकडे गोळा करताना युवक याठिकाणी दिसून येत आहे़ बुधवारी रात्री उशिरापर्यंत गोमाई नदीत काही महिला भाविकांकडून दशा मातेचे विसर्जन करण्यात येत होते़बामखेडा परिसरात वादळी वारेबामखेडा परिसरात रात्री ११ वाजता वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ जून महिन्यात विश्रांतीनंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला होता. परंतु बुधवारी मध्यरात्री सलग १ तास वादळी वाºयासह बामखेडा, वडाळी, खैरवे, भडगाव मातकुट, बोराळा जयनगर, कोंडावळ, फेस, दोंदवाडा, हिंगणी, तोरखेडा आणि काकर्दा या गावांमध्ये केळी, पपई, मिरची, कापूस आदी पिकांचे नुकसान झाले आहे़ वादळ वाºयामुळे पिके आडवी पडली होती़ यात अर्जुन चौधरी, मनोज चौधरी, वसंत पटेल, यादव पाटील, रविंद्र रत्नपारखी यांच्या पपई आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे़ कृषी विभागाने या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी आहे़ बामखेडा येथील पपई उत्पादक शेतकºयाने शेतात साचलेले पाणी मोटारद्वारे उपसून बाहेर काढले होते़बामखेडा परिसरात वादळी वारेसारंगंखेडा आणि परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतामध्ये पाणी साचले आहे़ यामुळे काही पिके पाण्याखाली गेली आहेत़ पाणी साचून राहिल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे़ सपाटीवरच्या शिवारातील कापूस, पपई, मूग, सोयाबीन, तूर, उडीद आदी पिके पाण्याखाली गेली आहेत़ अती पाण्यामुळे पिके वाया जावू नयेत यासाठी शेतकºयांकडून पंप लावून शेतातून पाणी काढण्याचे काम गुरूवारी सकाळी सुरू करण्यात आले आहे़ सारंगखेडा परिसरातील पपईच्या शेतातून सकाळी डिझेल पंपाच्या साह्याने अति पपई वाया जावू नये यासाठी शेतकरी कसरत करत असल्याचे दिसून आले़ शेतातील पाणी नाल्यात टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते़ या पावसामुळे दिलासा मिळाला तरी नुकसानीमुळे शेतकºयांच्या समाधानावर विरजण पडले आहे़ परिसरातील बºयाच शेतांमध्ये कापसाला बोेंडे फूटू लागल्याचे दिसून आले होते़ या शेतांमध्येही दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले़