शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

शहादा तालुक्यात वादळीवाऱ्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील गोमाई नदीला पुर आल्याने सकाळपासून नागरिकांनी पाडळदा पुलावर गर्दी केली होती़ यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा गोमाई नदीला पूर आला आहे़ यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विंधन विहिरींची पातळी वाढणार आहे़शहादा शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यापासून समाधानकारक पाऊस झाल्याने नदी-नाले वाहत आहेत़ दरा मध्यम प्रकल्पासह इतर प्रकल्पांमध्ये पाणी साठा झाला आहे़ पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ यातून कापूस सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुसरी नदीला पूर आला आहे़ दरम्यान गुरुवारी पहाटे झालेल्या पावसामुळे गोमाई नदीला पूर आला होता़ तिखोरा पुलावरून नदीतील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले़ पुरात वाहून आलेली लाकडे गोळा करताना युवक याठिकाणी दिसून येत आहे़ बुधवारी रात्री उशिरापर्यंत गोमाई नदीत काही महिला भाविकांकडून दशा मातेचे विसर्जन करण्यात येत होते़बामखेडा परिसरात वादळी वारेबामखेडा परिसरात रात्री ११ वाजता वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ जून महिन्यात विश्रांतीनंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला होता. परंतु बुधवारी मध्यरात्री सलग १ तास वादळी वाºयासह बामखेडा, वडाळी, खैरवे, भडगाव मातकुट, बोराळा जयनगर, कोंडावळ, फेस, दोंदवाडा, हिंगणी, तोरखेडा आणि काकर्दा या गावांमध्ये केळी, पपई, मिरची, कापूस आदी पिकांचे नुकसान झाले आहे़ वादळ वाºयामुळे पिके आडवी पडली होती़ यात अर्जुन चौधरी, मनोज चौधरी, वसंत पटेल, यादव पाटील, रविंद्र रत्नपारखी यांच्या पपई आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे़ कृषी विभागाने या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी आहे़ बामखेडा येथील पपई उत्पादक शेतकºयाने शेतात साचलेले पाणी मोटारद्वारे उपसून बाहेर काढले होते़बामखेडा परिसरात वादळी वारेसारंगंखेडा आणि परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतामध्ये पाणी साचले आहे़ यामुळे काही पिके पाण्याखाली गेली आहेत़ पाणी साचून राहिल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे़ सपाटीवरच्या शिवारातील कापूस, पपई, मूग, सोयाबीन, तूर, उडीद आदी पिके पाण्याखाली गेली आहेत़ अती पाण्यामुळे पिके वाया जावू नयेत यासाठी शेतकºयांकडून पंप लावून शेतातून पाणी काढण्याचे काम गुरूवारी सकाळी सुरू करण्यात आले आहे़ सारंगखेडा परिसरातील पपईच्या शेतातून सकाळी डिझेल पंपाच्या साह्याने अति पपई वाया जावू नये यासाठी शेतकरी कसरत करत असल्याचे दिसून आले़ शेतातील पाणी नाल्यात टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते़ या पावसामुळे दिलासा मिळाला तरी नुकसानीमुळे शेतकºयांच्या समाधानावर विरजण पडले आहे़ परिसरातील बºयाच शेतांमध्ये कापसाला बोेंडे फूटू लागल्याचे दिसून आले होते़ या शेतांमध्येही दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले़