शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
2
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
4
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
5
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
6
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
7
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
8
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
9
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
10
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
11
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
12
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
13
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
14
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
15
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
16
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
17
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
18
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
20
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार

भालेर येथे वीजपुरवठा खंडित असल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज ...

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज खांबांचे मोठे नुकसान झाले. भालेर परिसरात गारांमुळे शेतीपिकांची मोठी नासाडी झाली. शेतशिवारातील जीर्ण वीजतारा तुटणे, खांब वाकणे, खांब पडणे अशा अनेक घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, भालेर गावात तीन दिवसांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. त्यानंतर गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारातील वीजपुरवठा अद्याप सुरू न झाल्यामुळे वादळी पावसात वाचलेली पिके पाण्यावाचून जळत आहेत.

वीजपुरवठा खंडित होऊन आठवडा उलटला तरी भालेर परिसरात वीजखांब बदलवणे, दुरुस्ती करणे, वीजतारा नवीन टाकण्याचे काम संथ गतीने चालत असल्याने कृषी पंपांचा विद्युत पुरवठा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपत असल्याने भालेर परिसरातील शेतकऱ्यामध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेतपिकांतील ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग व भाजीपाला पिके पाण्याअभावी करपत असून वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दरम्यान, संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून वारंवार संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांकडून वीजतारा नवीन टाकणे, वीजखांब उभे करणे ही कामे संथ गतीने चालू असून होलिकोत्सव, संचारबंदी यासारख्या कारणांमुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. वीज पोल दुरस्ती करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून याबाबत वीज वितरण कंपनीने दखल घेऊन त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.