शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भालेर येथे वीजपुरवठा खंडित असल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज ...

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज खांबांचे मोठे नुकसान झाले. भालेर परिसरात गारांमुळे शेतीपिकांची मोठी नासाडी झाली. शेतशिवारातील जीर्ण वीजतारा तुटणे, खांब वाकणे, खांब पडणे अशा अनेक घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, भालेर गावात तीन दिवसांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. त्यानंतर गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारातील वीजपुरवठा अद्याप सुरू न झाल्यामुळे वादळी पावसात वाचलेली पिके पाण्यावाचून जळत आहेत.

वीजपुरवठा खंडित होऊन आठवडा उलटला तरी भालेर परिसरात वीजखांब बदलवणे, दुरुस्ती करणे, वीजतारा नवीन टाकण्याचे काम संथ गतीने चालत असल्याने कृषी पंपांचा विद्युत पुरवठा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपत असल्याने भालेर परिसरातील शेतकऱ्यामध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेतपिकांतील ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग व भाजीपाला पिके पाण्याअभावी करपत असून वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दरम्यान, संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून वारंवार संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांकडून वीजतारा नवीन टाकणे, वीजखांब उभे करणे ही कामे संथ गतीने चालू असून होलिकोत्सव, संचारबंदी यासारख्या कारणांमुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. वीज पोल दुरस्ती करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून याबाबत वीज वितरण कंपनीने दखल घेऊन त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.