शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

भालेर येथे वीजपुरवठा खंडित असल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज ...

जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज खांबांचे मोठे नुकसान झाले. भालेर परिसरात गारांमुळे शेतीपिकांची मोठी नासाडी झाली. शेतशिवारातील जीर्ण वीजतारा तुटणे, खांब वाकणे, खांब पडणे अशा अनेक घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, भालेर गावात तीन दिवसांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. त्यानंतर गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारातील वीजपुरवठा अद्याप सुरू न झाल्यामुळे वादळी पावसात वाचलेली पिके पाण्यावाचून जळत आहेत.

वीजपुरवठा खंडित होऊन आठवडा उलटला तरी भालेर परिसरात वीजखांब बदलवणे, दुरुस्ती करणे, वीजतारा नवीन टाकण्याचे काम संथ गतीने चालत असल्याने कृषी पंपांचा विद्युत पुरवठा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपत असल्याने भालेर परिसरातील शेतकऱ्यामध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेतपिकांतील ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग व भाजीपाला पिके पाण्याअभावी करपत असून वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दरम्यान, संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून वारंवार संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांकडून वीजतारा नवीन टाकणे, वीजखांब उभे करणे ही कामे संथ गतीने चालू असून होलिकोत्सव, संचारबंदी यासारख्या कारणांमुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. वीज पोल दुरस्ती करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून याबाबत वीज वितरण कंपनीने दखल घेऊन त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.