नंदुरबार तालुक्यात सेंद्रिय शेतीला प्राधान्य
नंदुरबार : आधुनिक शेतीत रासायनिक खते आणि फवारणीमुळे शेतजमिनीतील मातीमधील आवश्यक जीवनतत्त्वे नाश पावत असल्याने शेतीचे उत्पादन कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून मातीचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून परंपरागत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जात आहे.
शनिमांडळ आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य
नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या संरक्षण भिंतीजवळ घाणीचे साम्राज्य पसरले असून, आरोग्य केंद्राच्या संरक्षण भिंतीलगत उकिरडे टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. आरोग्य केंद्राच्या संरक्षक भिंतीजवळील भागात वाहने उभी करण्यात येत असल्याने कचऱ्यांचे ढीग साचल्याने डुकरांचा वावर वाढला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्येची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.