शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

शहादा तालुक्यात पिकांची स्थिती गंभीरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

शहादा : तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ८६ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. ...

शहादा : तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ८६ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु वातावरणात बदलांमुळे पाऊस पडूनही ही पिके धोक्यात आली असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नाची हमी देणाऱ्या बागायती पिकांत विविध रोगांनी शिरकाव केल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहादा तालुक्यात यंदा जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता तरीही काही शेतकऱ्यांनी आशेवर पेरणीची सुरुवात केली होती. पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली. ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसावर सर्वत्र पेरणी झाली. पेरणीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके तीव्र उन्हामुळे अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र तालुक्यातील काही भागात होते. गत तीन दिवसात तालुक्यात पाऊस कोसळत असला तरीही पूर्ण क्षमतेने पाऊस कोसळला नसल्याने पिकांची योग्य तशी वाढ होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले होते. शेतात उत्पादित झालेला माल लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागला. परिणामी उत्पादन खर्च अधिक झाल्याने खर्चही निघाला नाही. यंदा वरुणराजा चांगला बरसेल, या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, परंतु उशिराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र आजतरी तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यात यंदा बागायतदार शेतकऱ्यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी नुकसान होत आहे. पाऊस नसताना कापूस पिकावर लाल्या आल्याचे शेतकरी सांगत होते. यामुळे तालुक्यात कृषी विभागाने संपर्क करून माहिती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात बागायतदार पिकांचे क्षेत्र हे यंदाही चांगले आहे. यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

n तालुक्यात यंदा बागायतदार शेतकऱ्यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी नुकसान होत आहे. पाऊस नसताना कापूस पिकावर लाल्या आल्याचे शेतकरी सांगत होते. यामुळे तालुक्यात कृषी विभागाने संपर्क करून माहिती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात बागायतदार पिकांचे क्षेत्र हे यंदाही चांगले आहे. यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कडधान्य पिकांमध्ये यंदा घट

nयंदा तालुक्यात १० हजार ९७४ हेक्टर तृणधान्य तर तीन हजार ५४ हजार हेक्टरवर कडधान्यांचा पेरा आहे. ९ हजार १७९ हेक्टरवर गळीत धान्य तर ७१ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. जून महिन्यात पाऊसच न बरसल्याने कडधान्य पेरण्या अनेकांनी थांबवल्या होत्या.

nदुसरीकडे बागायती पिकांचा आढावा घेतला असताना तालुक्यात ५ हजार १९३ हेक्टरवर ऊस, ३ हजार ९४४ हेक्टरवर केळी, ४ हजार १११ हेक्टर पपई तर १ हजार ३६० हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात १५७ हेक्टरवर इतर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे.