शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पाण्यासाठी शेतक-यांवर दाखल होणार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:57 IST

पाटबंधारे विभागाचे अजब आदेश : पाणी चोरीच्या तोंडी माहितीवरून काढले पत्र

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : वावद, ता़ नंदुरबार येथील लघु प्रकल्पातून सिंचनासाठी शेतकरी पाणी चोरी करत असल्याचा आरोप करत लघुपाटबंधारे विभागाने शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले आहेत़ या आदेशांपूर्वी  नंदुरबार उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर याठिकाणी असा कोणताच प्रकार नसल्याचे समोर आल्यानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत़    वावद लघुतलावातून पाणी चोरी होत असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी धुळे पाटबंधारे विभागाला अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती़ या तोंडी माहितीनंतर धुळे पाटबंधारे विभागाने नंदुरबार येथील अधिका:यांना तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या़ यानुसार सोमवारी सकाळी उपविभागीय अभियंता एम़बी़ पाटील, शाखा अभियंता एऩएस़ पेटकर, आऱबी़ सोनार, योगेश कोळी, कालवा चौकीदार शंकर गवळी यांच्या पथकाने वावद येथे भेट देत पाहणी केली होती़ या वेळी त्यांना याठिकाणाहून पाणी चोरी होत असल्याचा कोणताही प्रकार आढळून आला नसल्याचा अहवाल दुपारी 12 वाजेर्पयत धुळे कार्यालयात पाठवण्यात आला़ यानंतरही  धुळे येथील मुख्य कार्यालयाने सोमवारी दुपारीच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना पत्र देत शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या शेतक:यांना गेल्या वर्षी पाणी उपसा करण्याची परवानगी होती़ यंदा मात्र या शेतक:यांनी कोणत्याही प्रकारे पाणी उपसा केला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे असतानाही विभागाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत़ विशेष म्हणजे वावद लघुतलावात केवळ 12 टक्के पाणीसाठा उपलब्ध आह़े पाटबंधारे विभागाने गेल्या रब्बी आणि चालू खरीप हंगामासाठी एकाही शेतक:याला यंदाच्या वर्षात पाणी परवानगी दिलेली नाही़ यापूर्वी परवानगी घेणा:या शेतक:यांनी मोटारी उचलून घेतल्या आहेत़ वावद ता़ नंदुरबार येथील लघुप्रकल्पातून पाणी उपसा करणा:या 10 शेतक:यांनी पाणी उपसा करण्यासाठी केवळ ईलेक्ट्रीक मोटार लावून पाणी उपसा करण्याची परवानगी असताना तलावाच्या जमिनीत 200 फूट खोल कूपनलिका करून त्यातून पाणी उपसा सुरू केल्याचे तसेच शेतक:यांनी 4 किलोमीटर्पयत पाईप लाईन टाकून नगदी पिकांसाठी पाणी चोरी केल्याची तक्रार पाटबंधारे विभागाच्या धुळे कार्यालयात केली होती़ 4यानुसार धुळे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना पत्र पाठवून पाणी उचलणा:या शेतक:यांवर गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले आह़े विशेष बाब म्हणजे नंदुरबार कार्यालयाचे उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांनी पडताळणी करून अहवाल पोहोचवण्यापूर्वीच कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिका:यांना हे पत्र दिले आह़े