शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

केळी दराबाबत व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जयनगर :  मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटल विक्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कजयनगर :  मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटल विक्री होणारी केळी फक्त ३५० ते ३५० रुपये प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती. मात्र आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच लॉकडाऊन नसताना केळीला त्याप्रमाणेच ३०० ते ४५० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून अधिकच कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे केळीला योग्य भाव मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.              तालुक्यातील जयनगरसह वडाळी, बामखेडा, कोंढावळ, कुकावल,    कोठली, धांद्रे, निंभोरे येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करतात. यावर्षीही या परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली आहे. मात्र  मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही         केळीला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.              हिवाळ्याच्या दिवसात केळीला चांगली मागणी असते. आता मार्गशीर्ष महिना हा खास करून महिलांचा उपवासाचा महिना आहे. या महिन्यात फळांना चांगली मागणी असते. पण व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. केळी लागवडीपासून तर उत्पन्न मिळेपर्यंत एका खोडाला ७० ते ८० रुपये खर्च येतो. रासायनिक    खतांचे भाव वाढल्याने खर्च वाढला आहे. म्हणून केळीवर केलेला खर्च व मिळालेला भाव यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकरी अधिकच कर्जबाजारी होत आहे.              आठ-दहा दिवसांपूर्वी जयनगरसह परिसरात सतत तीन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे परिपक्व झालेले केळीचे घड खाली पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.   त्यात दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकातून जेमतेम भांडवल निघाले आहे. तसेच मिरची पिकावर लाखो रुपयांचा खर्च करून मिरचीचे संपूर्ण पीकच सुरुवातीला वाया गेले होते. म्हणून याची भरपाई केळी पिकातून निघेल अशा आशेवर शेतकरी होता. मात्र अवकाळी पावसामुळे परिपक्व झालेले केळीचे घड खाली पडल्यामुळे भरपूर माल खराब झाल्यामुळे तसेच भाव नसल्यामुळे  शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढणारच आहे. म्हणून केळीच्या दराबाबत शासनाने शेतकऱ्यांना  चांगला दर मिळेल अशा योजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

केळीला मागणी अधिक असली तरी शेतकऱ्यांकडून मात्र प्रति क्विंटल ३०० ते ४५० रुपये एवढा कमी दर देऊन कापणी होत आहे. म्हणून सरासरी एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटल दर व्यापाऱ्यांकडून मिळायला हवा. तेव्हाच खर्च वजा करून शेतकऱ्याला थोडाफार नफा मिळण्यास मदत होईल.-हर्षल विकास पाटील, शेतकरी, जयनगर, ता. शहादा.