शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

जीपीएस प्रणाली बंद असल्याने वनपट्ट्यांची मोजणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:01 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  शासनाची जीपीएस प्राणालीची साईट गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्यामुळे अतिक्रमित वनपट्टे धारकांच्या जमिनीची मोजणीदेखील ...

 लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  शासनाची जीपीएस प्राणालीची साईट गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्यामुळे अतिक्रमित वनपट्टे धारकांच्या जमिनीची मोजणीदेखील रखडली आहे. तळोदा तालुक्यातील साधारण एक हजार ६०० अतिक्रमण धारकांना आपल्या हक्काच्या सातबाऱ्याची प्रतिक्षाच करावी लागत आहे. हे वनपट्टेधारक मोजणीसाठी सातत्याने तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु त्यांची बोळवणच केली जात आहे. निदान याप्रकरणी जिल्हा प्रशासनानेच वरिष्ठांशी संवाद साधून हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी मागणी आहे.तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, गढीकोठडा, रापापूर, चौगाव खुर्द, वाल्हेरी, माळखुर्द, मणिबेली, केवलापाणी, रावला पाणी, कोठार, बंधारा, अलवान, राणीपूर, वरपाडा, तयाचापळा, ढेकाटी, धजापाणी, बोरवण आदी गावांमधील वनजमीनधारक शेतकरी १९८० पासून वनजमीन खेडत होते. गेल्या ३५ वर्षांच्या शासना विरोधातील लढ्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने २०१५ मध्ये त्यांना या जमिनी मिळाल्या आहेत. शिवाय पुढील कार्यवाही केल्यानंतर शासनाने त्यांना दोन वर्षापूर्वीच जमिनीचा ताबा पावत्यादेखील दिल्या आहेत. परंतु त्यांच्या जमिनीची जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून मोजणी होत नसल्यामुळे त्यांचा सातबारादेखील आजतागायत रखडला आहे. या प्रणालीची साईट पुण्यामधूनफेब्रुवारी २०१८ पासून बंद करण्यात आली आहे. साहजिकच तळोदा तालुक्यातील साधारण एक हजार ६०० वनजमीन पट्टेधारकांना त्याचा फटका बसला आहे. सातबाऱ्यासाठीते गेल्या अडीच वर्षांपासून महसूल प्रशासनाकडे थेटे घालत आहेत. गेल्या आठवड्यात सुद्धाताबाऱ्यासाठीकाही शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनास साकडे घातले  होते.  मात्र वरूनच साईट बंद असल्यामुळे माेजणी करता येत नसल्याचे प्रशासनाने सांगितले होते. वास्तविक एक नव्हे तब्बल तीन वर्षांपासून जीपीएस प्रणालीची साईट पुण्याहून बंद झालेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे वरिष्ठ प्रशासनाची जबाबदारी असताना या प्रकरणी प्रशासनाने उदासिन भूमिका घेतल्याने वनअतिक्रमण धारक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही मौन धारण केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सरकारनेच आम्हास ताबा पावती दिली आहे. मग जपीएस मोजणीसाठी का? अडवणुकीचे धोरण अवलंबविली आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निदान जिल्हा प्रशासनाने तरी वरिष्ठ महसूल प्रशासनाशी संवाद साधून हा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा शेतकरी या विरोधात तीव्र आंदोलन छेडतील.

गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आम्ही वनजमीन खेडत असलो तरी त्याचा सातबारा आमच्या जवळ नसल्यामुळे कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका दाद देत नाही. आम्ही शासनाच्या ताबा पावत्या बँक प्रशासनाला दाखवतो तेव्हा सातबारा द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे सातबाऱ्या ऐवजी कर्जासाठी बँका दाद देत नाही. इकडे महसूल प्रशासन ताबा पावत्यांवर पीक कर्ज देण्याचा नियम आहे. या दोन्ही यंत्रणांच्या समन्वयअभावी वनजमीन धारक शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या बँक कर्ज प्रकरणी लीड बँकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सातबाऱ्याअभावी आदिवासी विकास विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वनपट्ट्यांसाठी शासनाविरोधात ३५ वर्षाच्या संघर्षानंतर जमीन मिळाली आहे. ताबा पावतीही दिली आहे. परंतु जीपीएस मोजणीचा   खोळंबा घेतला आहे. मोजणी करून देण्यासाठी सतत थेटे घालतो आहे. परंतु दाद दिली जात नाही. जिल्हा प्रशासनाने यातून मार्ग काढून आमचा हा प्रश्न मार्गी लावावा.        -मानसिंग कालू पाडवी,     वनजमीनधारक, शेतकरी,     लक्कडकोट, ता.तळोदा