शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ यातून समाधान व्यक्त होत असताना दोन्ही केंद्रातून दिल्लीकडे गाठी निर्यात होणे थांबल्याने नवीन कापूस साठा करण्यासाठी जागा नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी थांबवली आहे़ परिणामी दोन्ही केंद्रात हजारो कापसाच्या गाठी पडून आहेत़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रातून सीसीआयने ५१ हजार क्विंटल तर शहादा येथे १ लाख १० क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ खरेदी केलेल्या कापसाच्या जिनिंगमधून गाठी तयार करुन त्या निर्यातीचे धोरण सीसीआयचे आहे़ परंतू देशातील कापसाची खरेदी करणाऱ्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे़ यातून भारत-चीन व्यापार संबधात आयात निर्यातवर निर्बंध आल्याने त्याचा परिणाम म्हणून कापूस गाठींचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे़ नंदुरबार येथील जिनिंगमध्ये आजअखेरीस १ हजार कापूस गाठी पडून असल्याची माहिती आहे़ तर शहादा येथील जिनिंगमध्ये गाठींची संख्या प्रचंड वाढल्याने ठेवण्यासाठी भाडोत्री गोदाम शोधण्याची वेळ संबधितांवर येऊन ठेपली आहे़ नंदुरबार येथील केंद्रात जागाच नसल्याने पाच दिवसांपासून तर शहादा येथे तब्बल आठ दिवसांपासून खरेदी बंद आहे़ गोडावून मिळाल्यानंतर पुढील खरेदीची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे़ येत्या काळात पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी सीसीआय वाढीव गोडावून भाड्याने घेण्याच्या प्रयत्नात आहे़दरम्यान सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाचे देण्याबाबत अडचणी येत असल्याने कापूस खरेदी बंद झाल्याची माहिती समोर आली होती़ परंतू शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येत असल्याने तसा कोणताही प्रकार नसल्याचे सीसीआय आणि बाजार समित्यांकडून स्पष्ट केले आहे़नंदुरबार बाजार समितीत यंदा कापसाला प्रतीक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५४० या दरम्यान दर देण्यात आले आहेत़ यातून ५१ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे़ पळाशी येथील केंद्रावर सीसीआयसोबत खाजगी चार परवानाधारकांकडून खरेदी केली जाते़ परंतू सीसीआयने सर्वाधिक भाव दिल्याने शेतकºयांनी त्यांच्याकडे कापूस विक्रीला प्राधान्य दिले होते़ गेल्या काही दिवसात खरेदी केलेल्या गाठींची निर्यात झालेली नसल्याने त्या पडून आहेत़ यातून मग साठवण्यासाठी जागा मिळत नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे़ खरेदी बंद असल्याच्या काळात सीसीआय आणि बाजार समितीने जिल्ह्यातील विविध भागात साठा कºरण्यासाठी गोडावूनचा शोध सुरु केला आहे़ याला अद्याप यश आलेले नसल्याची माहिती आहे़