शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ यातून समाधान व्यक्त होत असताना दोन्ही केंद्रातून दिल्लीकडे गाठी निर्यात होणे थांबल्याने नवीन कापूस साठा करण्यासाठी जागा नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी थांबवली आहे़ परिणामी दोन्ही केंद्रात हजारो कापसाच्या गाठी पडून आहेत़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रातून सीसीआयने ५१ हजार क्विंटल तर शहादा येथे १ लाख १० क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ खरेदी केलेल्या कापसाच्या जिनिंगमधून गाठी तयार करुन त्या निर्यातीचे धोरण सीसीआयचे आहे़ परंतू देशातील कापसाची खरेदी करणाऱ्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे़ यातून भारत-चीन व्यापार संबधात आयात निर्यातवर निर्बंध आल्याने त्याचा परिणाम म्हणून कापूस गाठींचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे़ नंदुरबार येथील जिनिंगमध्ये आजअखेरीस १ हजार कापूस गाठी पडून असल्याची माहिती आहे़ तर शहादा येथील जिनिंगमध्ये गाठींची संख्या प्रचंड वाढल्याने ठेवण्यासाठी भाडोत्री गोदाम शोधण्याची वेळ संबधितांवर येऊन ठेपली आहे़ नंदुरबार येथील केंद्रात जागाच नसल्याने पाच दिवसांपासून तर शहादा येथे तब्बल आठ दिवसांपासून खरेदी बंद आहे़ गोडावून मिळाल्यानंतर पुढील खरेदीची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे़ येत्या काळात पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी सीसीआय वाढीव गोडावून भाड्याने घेण्याच्या प्रयत्नात आहे़दरम्यान सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाचे देण्याबाबत अडचणी येत असल्याने कापूस खरेदी बंद झाल्याची माहिती समोर आली होती़ परंतू शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येत असल्याने तसा कोणताही प्रकार नसल्याचे सीसीआय आणि बाजार समित्यांकडून स्पष्ट केले आहे़नंदुरबार बाजार समितीत यंदा कापसाला प्रतीक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५४० या दरम्यान दर देण्यात आले आहेत़ यातून ५१ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे़ पळाशी येथील केंद्रावर सीसीआयसोबत खाजगी चार परवानाधारकांकडून खरेदी केली जाते़ परंतू सीसीआयने सर्वाधिक भाव दिल्याने शेतकºयांनी त्यांच्याकडे कापूस विक्रीला प्राधान्य दिले होते़ गेल्या काही दिवसात खरेदी केलेल्या गाठींची निर्यात झालेली नसल्याने त्या पडून आहेत़ यातून मग साठवण्यासाठी जागा मिळत नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे़ खरेदी बंद असल्याच्या काळात सीसीआय आणि बाजार समितीने जिल्ह्यातील विविध भागात साठा कºरण्यासाठी गोडावूनचा शोध सुरु केला आहे़ याला अद्याप यश आलेले नसल्याची माहिती आहे़