शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

विवाहाचा खर्च सैनिक पाल्यांच्या शिक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आर्थिक परिस्थिती सर्वोत्तम असतानाही आपल्या मुलांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने अर्थात नोंदणी पद्धतीने करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आर्थिक परिस्थिती सर्वोत्तम असतानाही आपल्या मुलांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने अर्थात नोंदणी पद्धतीने करून विवाहासाठी लागणारा सर्व खर्च हा शहीद सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय शिरूडदिगर, ता.शहादा येथील पाटील परिवाराने घेतला. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने समाजसेवा करीत समाजासमोर आदर्श त्यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे या विवाहातील वर वधू हे दोन्ही उच्चशिक्षित असून दोघेही मुंबई येथे मोठ्या पदावर कार्यरत आहेत.शहादा तालुक्यातील शिरूड दिगर येथील येथील सेवा निवृत अभियंता विपीन देविदास पाटील यांचा एकुलता एक मुलगा मनिष यांचा विवाह मुंबई येथील डॉ. अजय नरोतम पाटील यांची कन्या वृषाली हिच्याशी समाजाच्या रितीरिवाजानुसार निश्चित झाला. एकमेकांची पसंती झाल्यानंतर लग्नाची तारीख परिवाराच्या संमतीने ठरविण्यात आली. मात्र आपला विवाह हा नोंदणी पद्धतीने व्हावा अशी विनंती मनीषने आपले माता-पिता व होणाऱ्या सासू-सासऱ्यांना केली.विवाहासाठी लागणारा सर्व खर्च हा मला देशाच्या सेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या मूलांच्या शिक्षणासाठी करावयाचा असल्याचा मानस त्याने व्यक्त केल्यानंतर नववधू वृषाली सह दोन्ही परिवाराने यास संमती दिली. त्यानंतर हा विवाह सोहळा ११ मार्च रोजी नंदुरबार येथील रजिस्टर कार्यालयात पार पडला.कुठलीही पत्रिका नाही, नातेवाईकांना आमंत्रण नाही, लग्नाचा बडेजाव नाही की वारेमाप उधळपट्टी नाही. प्रि वेडिंग, वेडिंग व आफ्टर वेडिंग फोटोसेशन असे काही नाही. बदलत्या काळात विवाह सोहळे अतिशय दिमाखदार होत आहेत. लग्न राजेशाही पद्धधतीने व्हावे प्रत्येकाने त्याचे कायम नाव काढावे अशी इच्छा नववधू सह त्यांच्या मातापित्यांची असते. या सर्व बाबीला त्यांनी फाटा दिला.वर मनीष हा बीई सिव्हिल एमबीए असा उच्चशिक्षित असून मुंबई येथील एका बँकेत उच्च पदावर कार्यरत आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे तर नववधू वृषाली ने गणित विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केली असून तिही मुंबई येथे एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.युवकांचा आदर्श...कौतुक या दोन्ही मुलांचे आहे कारण प्रत्येक लग्नाळू तरुण तरुणीला आपलं लग्न मोठ्या दिमाखात व्हावे असेच वाटते. परंतु अतिशय दुर्मिळ अशी उच्च विचारसरणी लाभलेल्या या दोन्ही मुलांना दिमाखदार सोहळ्याचे कौतुक नव्हते तर या सोहळ्यामध्ये लाखों नी होणारा खर्च वाचवून हा पैसा सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार होता. संकल्प तडीस नेला म्हणून त्यांचे विशेष करावे असेच असल्याचे मत बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अभियंता शरद पाटील यांनी व्यक्त केले.विवाहांमध्ये होणारा खर्च हा सर्वसामान्यांना न परवडणारा असतो. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य कुटूंब कर्ज काढून विवाह करीत असतो. उच्च शिक्षीत युवकांनी असे आदर्श पायंडे पाडले तर नक्कीच एक वेगळा संदेश समाजात जाणार आहे. एक, दोन दिवसांचा बडेजाव कर्जाच्या खाईत लोटणारा असतो.