शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाचा खर्च सैनिक पाल्यांच्या शिक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आर्थिक परिस्थिती सर्वोत्तम असतानाही आपल्या मुलांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने अर्थात नोंदणी पद्धतीने करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आर्थिक परिस्थिती सर्वोत्तम असतानाही आपल्या मुलांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने अर्थात नोंदणी पद्धतीने करून विवाहासाठी लागणारा सर्व खर्च हा शहीद सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय शिरूडदिगर, ता.शहादा येथील पाटील परिवाराने घेतला. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने समाजसेवा करीत समाजासमोर आदर्श त्यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे या विवाहातील वर वधू हे दोन्ही उच्चशिक्षित असून दोघेही मुंबई येथे मोठ्या पदावर कार्यरत आहेत.शहादा तालुक्यातील शिरूड दिगर येथील येथील सेवा निवृत अभियंता विपीन देविदास पाटील यांचा एकुलता एक मुलगा मनिष यांचा विवाह मुंबई येथील डॉ. अजय नरोतम पाटील यांची कन्या वृषाली हिच्याशी समाजाच्या रितीरिवाजानुसार निश्चित झाला. एकमेकांची पसंती झाल्यानंतर लग्नाची तारीख परिवाराच्या संमतीने ठरविण्यात आली. मात्र आपला विवाह हा नोंदणी पद्धतीने व्हावा अशी विनंती मनीषने आपले माता-पिता व होणाऱ्या सासू-सासऱ्यांना केली.विवाहासाठी लागणारा सर्व खर्च हा मला देशाच्या सेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या मूलांच्या शिक्षणासाठी करावयाचा असल्याचा मानस त्याने व्यक्त केल्यानंतर नववधू वृषाली सह दोन्ही परिवाराने यास संमती दिली. त्यानंतर हा विवाह सोहळा ११ मार्च रोजी नंदुरबार येथील रजिस्टर कार्यालयात पार पडला.कुठलीही पत्रिका नाही, नातेवाईकांना आमंत्रण नाही, लग्नाचा बडेजाव नाही की वारेमाप उधळपट्टी नाही. प्रि वेडिंग, वेडिंग व आफ्टर वेडिंग फोटोसेशन असे काही नाही. बदलत्या काळात विवाह सोहळे अतिशय दिमाखदार होत आहेत. लग्न राजेशाही पद्धधतीने व्हावे प्रत्येकाने त्याचे कायम नाव काढावे अशी इच्छा नववधू सह त्यांच्या मातापित्यांची असते. या सर्व बाबीला त्यांनी फाटा दिला.वर मनीष हा बीई सिव्हिल एमबीए असा उच्चशिक्षित असून मुंबई येथील एका बँकेत उच्च पदावर कार्यरत आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे तर नववधू वृषाली ने गणित विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केली असून तिही मुंबई येथे एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.युवकांचा आदर्श...कौतुक या दोन्ही मुलांचे आहे कारण प्रत्येक लग्नाळू तरुण तरुणीला आपलं लग्न मोठ्या दिमाखात व्हावे असेच वाटते. परंतु अतिशय दुर्मिळ अशी उच्च विचारसरणी लाभलेल्या या दोन्ही मुलांना दिमाखदार सोहळ्याचे कौतुक नव्हते तर या सोहळ्यामध्ये लाखों नी होणारा खर्च वाचवून हा पैसा सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार होता. संकल्प तडीस नेला म्हणून त्यांचे विशेष करावे असेच असल्याचे मत बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अभियंता शरद पाटील यांनी व्यक्त केले.विवाहांमध्ये होणारा खर्च हा सर्वसामान्यांना न परवडणारा असतो. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य कुटूंब कर्ज काढून विवाह करीत असतो. उच्च शिक्षीत युवकांनी असे आदर्श पायंडे पाडले तर नक्कीच एक वेगळा संदेश समाजात जाणार आहे. एक, दोन दिवसांचा बडेजाव कर्जाच्या खाईत लोटणारा असतो.