शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या मृत्युमुळे यंदा अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा खर्च झाला दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST

नंदुरबार : कोरोना तसेच इतर कारणांमुळे शहरासह परिसरात गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या वाढल्याने व त्या अनुषंगाने नंदुरबारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचीही ...

नंदुरबार : कोरोना तसेच इतर कारणांमुळे शहरासह परिसरात गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या वाढल्याने व त्या अनुषंगाने नंदुरबारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचीही संख्या वाढल्याने गेल्या वर्षभरात पालिकेला दुप्पट जळाऊ लाकूड लागले आहे. त्यामुळे पालिकेला दहा लाखांची करावी लागलेली खर्च मर्यादा वाढवून ती २० लाख रुपये करावी लागत आहे.

गेल्या वर्षभरात कोरोना तसेच इतर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नंदुरबारच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण देखील वाढल्याचे गेल्या वर्षभरात दिसून आले. त्यामुळे पालिकेला अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या जळाऊ लाकडांचा खर्च जवळपास दहा लाखांनी वाढला असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार पालिकेतर्फे पालिकेच्या स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड पुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. साधारणत: दहा लाखांचा खर्च त्यासाठी केला जात असतो. तेव्हढ्या खर्चाच्या लाकडात वर्षभर निभावून नेले जाते. येथे होणाऱ्या सरासरी अंत्यसंस्काराच्या मर्यादेनुसार हा लाकूड पुरवठा केला जात असतो.

यंदा मात्र, दुप्पट लाकूड

यंदा पालिकेच्या स्मशानभूमीत दुप्पट लाकूड लागल्याचे चित्र आहे. त्याचा खर्च १५ लाखांपेक्षा अधिक गेला आहे. हा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे. अर्थात मानवतेच्या दृष्टकोनातून पालिकेने घेतलेला हा निर्णय असल्यामुळे अतिरिक्त खर्चाबाबत पालिकेने झळ सोसण्याची मानसिकता करून घेतली आहे.

अनेक वर्षांपासूनची सेवा

पालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा सुरू ठेवली आहे. सामान्य कुटुंबासह उच्च वर्गीय कुटुंबांचीही अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकूड खर्चापासून सुटका झाली आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च मोठा असतो.

शिवाय शहरी भागात लाकूड मिळविण्यासाठी मोठी कसरत असते. अशावेळी मोफत लाकूड मिळाल्यास त्याला मोठा दिलासा मिळतो. पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक सामन्य कुटुंबांची आर्थिक बचतदेखील झाली आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर मोफत अंत्यसंस्कार...

n कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर पालिकेने मोफत अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी पालिकेच्या जुन्या स्मशानभूमीत अग्नीदाहची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी देखील जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गीत व संशयित अशा जवळपास ३२५ पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत.

नंदुरबार पालिकेतर्फे मानवतेच्या दृष्टिकोनातून अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड पुरवठा केला जातो. वर्षभरात जिल्हाभरातील कोरोनामुळे व कोरोना संशयितांचे अंत्यसंस्कार पालिकेच्या स्मशानभूमीत मोफत केले गेले. त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या. त्यामुळे यंदा लाकूड जास्त लागले. यापुढील काळात वीज दाहिनीचा विचार असून त्यासाठी प्राथमिक स्तरावर चाचपणी केली जात आहे.

-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,

नगराध्यक्षा, नंदुरबार.