शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

कोरोनाच्या मृत्युमुळे यंदा अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा खर्च झाला दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST

नंदुरबार : कोरोना तसेच इतर कारणांमुळे शहरासह परिसरात गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या वाढल्याने व त्या अनुषंगाने नंदुरबारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचीही ...

नंदुरबार : कोरोना तसेच इतर कारणांमुळे शहरासह परिसरात गेल्या वर्षभरात मृत्यूंची संख्या वाढल्याने व त्या अनुषंगाने नंदुरबारातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचीही संख्या वाढल्याने गेल्या वर्षभरात पालिकेला दुप्पट जळाऊ लाकूड लागले आहे. त्यामुळे पालिकेला दहा लाखांची करावी लागलेली खर्च मर्यादा वाढवून ती २० लाख रुपये करावी लागत आहे.

गेल्या वर्षभरात कोरोना तसेच इतर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नंदुरबारच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांचे प्रमाण देखील वाढल्याचे गेल्या वर्षभरात दिसून आले. त्यामुळे पालिकेला अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या जळाऊ लाकडांचा खर्च जवळपास दहा लाखांनी वाढला असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार पालिकेतर्फे पालिकेच्या स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड पुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. साधारणत: दहा लाखांचा खर्च त्यासाठी केला जात असतो. तेव्हढ्या खर्चाच्या लाकडात वर्षभर निभावून नेले जाते. येथे होणाऱ्या सरासरी अंत्यसंस्काराच्या मर्यादेनुसार हा लाकूड पुरवठा केला जात असतो.

यंदा मात्र, दुप्पट लाकूड

यंदा पालिकेच्या स्मशानभूमीत दुप्पट लाकूड लागल्याचे चित्र आहे. त्याचा खर्च १५ लाखांपेक्षा अधिक गेला आहे. हा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे. अर्थात मानवतेच्या दृष्टकोनातून पालिकेने घेतलेला हा निर्णय असल्यामुळे अतिरिक्त खर्चाबाबत पालिकेने झळ सोसण्याची मानसिकता करून घेतली आहे.

अनेक वर्षांपासूनची सेवा

पालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा सुरू ठेवली आहे. सामान्य कुटुंबासह उच्च वर्गीय कुटुंबांचीही अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकूड खर्चापासून सुटका झाली आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च मोठा असतो.

शिवाय शहरी भागात लाकूड मिळविण्यासाठी मोठी कसरत असते. अशावेळी मोफत लाकूड मिळाल्यास त्याला मोठा दिलासा मिळतो. पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक सामन्य कुटुंबांची आर्थिक बचतदेखील झाली आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर मोफत अंत्यसंस्कार...

n कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर पालिकेने मोफत अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी पालिकेच्या जुन्या स्मशानभूमीत अग्नीदाहची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी देखील जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गीत व संशयित अशा जवळपास ३२५ पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत.

नंदुरबार पालिकेतर्फे मानवतेच्या दृष्टिकोनातून अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड पुरवठा केला जातो. वर्षभरात जिल्हाभरातील कोरोनामुळे व कोरोना संशयितांचे अंत्यसंस्कार पालिकेच्या स्मशानभूमीत मोफत केले गेले. त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या. त्यामुळे यंदा लाकूड जास्त लागले. यापुढील काळात वीज दाहिनीचा विचार असून त्यासाठी प्राथमिक स्तरावर चाचपणी केली जात आहे.

-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,

नगराध्यक्षा, नंदुरबार.