शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्या वेटींगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रॅपीड अँटीजन टेस्टची स्थानिक ठिकाणी सोय करून देखील जिल्ह्यात कोरोना स्वॅब अहवालांची वेटींग वाढतच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रॅपीड अँटीजन टेस्टची स्थानिक ठिकाणी सोय करून देखील जिल्ह्यात कोरोना स्वॅब अहवालांची वेटींग वाढतच चालली आहे. शनिवारी सकाळपर्यंत तब्बल ४९० अहवाल प्रलंबीत होते. शनिवारी सायंकाळपर्यंत वेटींग ५२८ पर्यंत आली होती. एवढ्या मोठ्या संख्येने अहवाल प्रलंबीत राहत असल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढत चालला आहे.अहवाल येत नसल्याने अनेक संशयीत खुलेपणाने बाहेर फिरत असल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना धोका वाढत आहे. त्यामुळे नंदुरबारात नियोजित असलेली अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करावी अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वॅब संकलन देखील वाढविण्यात आले आहे. परंतु चाचणी अहवालच लवकरच येत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी सकाळी जवळपास ४९० वेटींग होती. ती दुपारपर्यंत ५२८ वर आली होती. सायंकाळी उशीरापर्यंत काही अहवाल येण्याची शक्यता होती.स्वॅब वाढले, चाचण्या कमीजिल्ह्यात विशेषत: नंदुरबार व शहादा येथे स्वॅब संकलन वाढले आहे. त्यासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली आहे. नंदुरबारात दोन फिरते पथक कार्यान्वीत करून ते स्वॅब संकलन करीत आहेत. याशिवाय नंदुरबार जिल्हा रुग्णालय आणि शहादा येथील कोविड कक्षात देखील स्वॅब संकलन केंद्र सुरू आहे. येत्या काळात नंदुरबारात आणखी दोन ठिकाणी आणि तळोदा व नवापूर येथे स्वॅब संकलनाची सोय करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.स्वॅब संकलन वाढले असले तरी चाचण्या मात्र वेळेवर होत नसल्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला आहे.वेगवेगळया ठिकाणी उपचारआजाराची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोविड केअर सेंटर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १४ वैद्यकीय अधिकारी, ३३ परिचारिका, २ इतर अधिकारी आणि २० इतर कर्मचारी रुग्णांना २४ तास सेवा देत आहेत. काही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होवूनही रुग्णसेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. बरे होणाºया रुग्णांनी उत्स्फुर्तपणे संकटाच्या परिस्थितीत सेवा देणाºया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबद्दल आदराची भावना व्यक्त केली आहे.जिल्हा प्रशासनातर्फे रुग्णालयात सर्व प्रकारची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या आहारावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्यादृष्टीने त्यांना उपचार व आहार देण्यात येत आहे. त्यामुळे बरे होणाºयांची संख्या सातत्याने वाढते आहे. रक्तदाब, मधुमेह आदी आजार असणारे आणि वृद्ध रुग्णदेखील वेळीच तपासणी झाल्याने बरे झाले आहेत.१३५ आॅक्सीजन बेड : जिल्हा शासकीय रुग्णालयात ३८ व्हेंटीलेटर्स व ३० आॅक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. येत्या आठवड्यात त्यात आणखी १३५ आॅक्सिजन बेड्सची भर पडणार आहे. शिवाय कोरोनावर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी शासन स्तरावरदेखील प्रयत्न करीत आहेत. वेळेवर आजाराचे निदान झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढू शकेल. त्यामुळे शहरी भागात मोबाईल स्वॅब टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.नागरिकांनी ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. आजार उपचारानंतर बरा होत असल्याने न घाबरता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.