शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कोरोना लसीकरण : नंदुरबार पालिकेचे अनुकरण व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST

मनोज शेलार कोरोना लसीकरणाची गती आता कुठे वाढली आहे. सुरवातीला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण होत आहे. परंतु सामान्य नागरिक ...

मनोज शेलार

कोरोना लसीकरणाची गती आता कुठे वाढली आहे. सुरवातीला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण होत आहे. परंतु सामान्य नागरिक अजूनही त्यापासून दूर आहे. त्यांना खासगी स्वरूपात पैसे मोजून लसीकरण करून घ्यावे लागेल किंवा कसे याबाबत काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे संभ्रम आहे. काळाची आगामी पाऊले ओळखून नंदूरबार नगरपालिकेने लसीकरण सुरू होण्याच्या आधीच दारिद्र्यरेषेखालील आपल्या शहरवासीयांसाठी थेट एक कोटी रुपयांची तरतूद करून घेतली आहे. सवलतीच्या दरात लस मिळावी यासाठी सीरम इन्स्टिट्यूटकडे विनंती देखील केली आहे. नंदूरबार पालिकेचे अनुकरण जिल्ह्यातील इतर नगरपालिका व नगरपंचायतींनी तसेच जिल्हा परिषदेनेही केले तर सामान्य, गरीब नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहणार नाही हे स्पष्टच आहे.

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णामुळे अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लॉकडाऊनही सुरू आहे. अशा वेळी आता सर्वांनाच लसीकरणाचे महत्व पटू लागले आहे. जिल्ह्यात सुरुवातीला अर्थात पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा वेग अतिशय कमी होता. अनेकजण भीतीपोटी लस घेत नव्हते. दुसऱ्या टप्प्यात मात्र वेग बऱ्यापैकी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जात असली तरी सर्वसामान्यांना लस देण्याबाबत अद्याप काहीही सूतोवाच नाही. लस विकत घ्यावी लागणार आहे का? ती कशी, त्यासाठी कुणी दाते पुढाकार घेणार किंवा कसे? याबाबत सामान्यांच्या मनात संभ्रम आहे. हे संभ्रम निर्माण होण्याच्या आधीच अर्थात दीड महिन्यापूर्वीच नंदूरबार पालिकेने आपल्या शहरातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. जवळपास २० ते २२ हजार नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूदही करून घेतली आहे. जर आणखी निधी लागला तर त्यासाठीही पालिकेने तयारी करून ठेवली आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह तर आहेच शिवाय असा निर्णय घेणारी नंदूरबार पालिका ही राज्यात पहिलीच पालिका असण्याचीही शक्यता आहे. हे सर्व करीत असतांना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी शहरातील प्रत्येक नागरिकाला लस मिळाल्याशिवाय आपण लस टोचून घेणार नाही हा संकल्प देखील केला आहे. आपल्या शहरवासीयांच्या दृष्टीने एवढी संवेदनशीलता ठेवणारे नेते अभावनेच आढळतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नंदूरबार पालिकेचा या उपक्रमाचा कित्ता आता सर्वच नगरपालिकांनी गिरवावा अशी अपेक्षा आहे. शहादा, नवापूर, तळोदा यासह धडगाव नगरपंचायत तसेच अक्कलकुवासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीनेही याबाबत विचार करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील एकही सर्वसामान्य व गरीब कुटूंब कोरोना लसीकरणापासून वंचित राहणार नाही यात शंका नाही. ज्या पालिकांची किंवा नगरपंचायतीची आर्थिक स्थिती नसेल त्यांना विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन निधी उभारून द्यावा किंवा मोठ्या कंपनीच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्धतेसाठी पुढाकार घेणे आवश्यक ठरणार आहे.

नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदेने देखील ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी अशा प्रकारच्या आर्थिक प्राविधानाविषयी पाऊल उचलणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी माझगाव डाॅक यांच्या सीएसआर फंडातून २० रुग्णवाहिका मिळविल्या आहेत. याच पद्धतीने त्यांनी सीएसआर फंड उपलब्ध करून कोरोना लसीकरणासाठी त्याचा उपयोग करून घेतल्यास ते जिल्ह्याच्या दृष्टीने एक वेगळे उदाहरण ठरू शकणार आहे. आधीच जिल्हा केंद्र सरकारच्या यादीत आकांक्षित जिल्हा म्हणून नोंद आहे. दरडोई उत्पन्नात नंदूरबार जिल्हा राज्यात सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक दारिद्र्य रेषेखालील कुटूंब संख्या असलेला जिल्हा म्हणूनही जिल्ह्याची नोंद आहे. असे सर्व असताना जिल्ह्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळावी यासाठी शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा व त्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.