शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कोरोनाने शिकविला बचतीचा मार्ग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

ब्राह्मणपुरी : कोरोनाच्या संसर्गाने नागरिक त्रस्त झाले असले, तरी या काळात निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईने नागरिकांना खूप काही शिकविले ...

ब्राह्मणपुरी : कोरोनाच्या संसर्गाने नागरिक त्रस्त झाले असले, तरी या काळात निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईने नागरिकांना खूप काही शिकविले आहे. त्यातूनच पूर्वीच्या तुलनेत होणारे घर खर्च निम्म्यावर आले आहेत.

कोरोना काळात शासनस्तरावर लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील सर्वच दुकाने अनेक दिवस बंद राहिली. यामुळे व्यावसायिक, उद्योजक अडचणीत सापडल्याने त्यांच्याकडे काम करीत असलेल्या अनेकांच्या नोकऱ्यांवर समस्या आली. विशेषत: खासगी क्षेत्रात कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कमी झाले. बाजारपेठेत छोटी दुकाने थाटणाऱ्यांवर तसेच रिक्षाचालकांवरही आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे अनेकांनी काटकसरीचा पर्याय स्वीकारला असून, प्रत्येक घरात किचनपासून कटिंगपर्यंत कॉस्टकटिंग सुरू झाले आहे.

कुठे कुठे केली कॉस्टकटिंग

शाळा नसल्याने मुलांवरील खर्चही कमी होत आहे.

लागतील तेवढ्याच भाज्या खरेदी केल्या जात आहेत. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी भाजीपाला व्यवसायाबरोबर घरीच केक बनविला जात आहे.

घरात कंटाळा आला म्हणून आणण्यात येणारे पार्सल बंद होऊन घरातच स्वयंपाक केला जात आहे.

ब्यूटी पार्लरमधील वेगवेगळे मेकअप करण्यावर महिलांचे हजारो रुपये खर्च होत होते. कोरोनाकाळात ब्यूटी पार्लर बंद होते. कार्यक्रमही बंद होते. त्यामुळे महागडा मेकअप लावण्याची गरज राहिली नसल्याने यातून बराच खर्च वाचला आहे. पुरुष वर्गानेही चेहऱ्याचा मसाज बंद केला. सेव्हिंगही घरीच उरकली जात आहे.

तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक गृहिणींनी आपल्या दैनंदिन स्वयंपाकात तेलाचा वापर कमी करण्याचे धोरण राबविले. तसेच विजेची बचत करण्यासाठी अनावश्यक विजेचा वापर टाळला.

कपडे, लग्न समारंभ, फिरणे टाळले

आम्ही कपडे, लग्न समारंभ, फिरणे टाळले असून, खर्चावर मर्यादा आणली आहे. कोरोना संकट काळापूर्वी दरवर्षी बाहेरगावी जाणे-येणे सुरू होते. परंतु कोरोना संकट काळापासून बाहेरगावी येणे-जाणे बंद केले आहे. - उजनबाई चिंधा राजपूत, ब्राह्मणपुरी, ता. शहादा

दैनंदिन खर्चात केली कपात

कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले असतानाच दुसरीकडे महागाईने कळस गाठला आहे. यामुळे घरात लागणाऱ्या साहित्याच्या खर्चात कपात केली आहे. - शीतल कन्हैया मराठे, गृहिणी, ब्राह्मणपुरी

परिस्थिती काटकसरीने सावरत आहे

प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल केल्याने काही प्रमाणात रिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. मात्र, प्रवासी नेण्याची मुभा आणि रिक्षात बसण्यास लोकांच्या मनात असलेली भीती यांमुळे दिवसभर थांबूनही चार पैसे मिळताना मारामार होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना कसरत होत आहे. यामुळे दैनंदिन खर्च काटकसरीने करीत आहे. - कामिनी विनोद पाटील, सुलतानपूर, ता. शहादा.

भाजीपाला घरीच लागवड करण्यात येत आहे

दाढी-कटिंग घरीच केली जात आहे

केक घरीच तयार करण्यात येत आहे.

नवीन कपडे तसेच समारंभाला जाणे टाळले जात आहे.

ब्युटी पार्लरमध्ये जाणे बंद.

किराणा, भाजीपाला, दैनंदिन खर्चावर मर्यादा आल्या आहेत.