शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे शहादा तालुक्यात वाढताहेत कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

वर्षभरापूर्वी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रुग्ण आढळलेल्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित ...

वर्षभरापूर्वी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रुग्ण आढळलेल्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. तसेच सार्वजनिक बाजारपेठ, रस्ते, गर्दीच्या ठिकाणी व प्रवासी वाहनांचे सॅनिटायझर करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे वाढणारा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला चांगले यश मिळाले असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसागणिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अंशतः लॉकडाऊन लागू करून विविध निर्बंध घातले आहेत. मात्र कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी होणारी स्वच्छता, सॅनिटायझर व प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे आदी महत्त्वपूर्ण बाबींना दुर्लक्षित करण्यात येत असल्याने वाढता संसर्ग रोखणार कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

ग्रामदक्षता समिती नावालाच

ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील मिळून ग्रामदक्षता समिती तयार करण्यात आली. परंतु तलाठी, ग्रामसेवक हे गावात फिरकत नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून संबंधित ग्रामदक्षता समितीच्या सदस्यांना ग्रामीण भागात लक्ष घालून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली.