शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे शहादा तालुक्यात वाढताहेत कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

वर्षभरापूर्वी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रुग्ण आढळलेल्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित ...

वर्षभरापूर्वी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रुग्ण आढळलेल्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. तसेच सार्वजनिक बाजारपेठ, रस्ते, गर्दीच्या ठिकाणी व प्रवासी वाहनांचे सॅनिटायझर करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे वाढणारा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला चांगले यश मिळाले असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसागणिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अंशतः लॉकडाऊन लागू करून विविध निर्बंध घातले आहेत. मात्र कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी होणारी स्वच्छता, सॅनिटायझर व प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे आदी महत्त्वपूर्ण बाबींना दुर्लक्षित करण्यात येत असल्याने वाढता संसर्ग रोखणार कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

ग्रामदक्षता समिती नावालाच

ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील मिळून ग्रामदक्षता समिती तयार करण्यात आली. परंतु तलाठी, ग्रामसेवक हे गावात फिरकत नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून संबंधित ग्रामदक्षता समितीच्या सदस्यांना ग्रामीण भागात लक्ष घालून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली.