शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीला कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

नंदुरबार : कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केले होते. या लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असताना कोरोनाच्या वेदनादायी आठवणींबरोबरच ...

नंदुरबार : कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केले होते. या लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असताना कोरोनाच्या वेदनादायी आठवणींबरोबरच नव्याने सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाने समाजमन चिंतीत झाले आहे. दिनांक ११ मार्च २०२१नंतर गेल्या १२ दिवसात रुग्णांची संख्या गेल्यावर्षाच्या तुलनेत रोज तीनपटीने वाढत असल्याने कोरोनाची भीती अधिकच वाढली आहे.

देशात मार्च २०२०मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला जनता कर्फ्यू व त्यानंतर लॉकडाऊन जाहीर केले होते. जवळपास सहा महिने लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. गतिमान झालेले लोकजीवन थांबल्यासारखी अवस्था होती. पण सुरुवातीचे सहा महिने म्हणजे मार्च ते जुलै या दरम्यान जिल्ह्यातील वातावरण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत काहीसे दिलासादायक होते. मार्च महिन्यात जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. पहिला रुग्ण १८ एप्रिल २०२० रोजी आढळल्यानंतर जिल्ह्यात जनमानसात भीतीचे वातावरण होते. पुढे २१ एप्रिल २०२०ला कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याने लोकांमध्ये अधिकच भीती होती. पण राज्याच्या तुलनेत कोरोनाचे नवीन रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात दिलासादायक होते.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जनतेने अतिशय कडक नियम पाळले. आदिवासी भागात तर संबंधित गावातील लोकांनी बाहेरच्या व्यक्तिंना पूर्णत: गावबंदी केली होती. त्यासाठी स्वतंत्र पहारा देण्यासाठी युवकांचे पथक कार्यरत झाले होते. एवढेच नव्हे तर काही गावांनी अगदी दगड टाकून, काटे टाकून रस्तेच बंद केले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रसार जिल्ह्यात झाला नाही. मात्र, जून २०२०नंतर हळूहळू प्रसार वाढला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर रुग्णांनी उच्चांक गाठला होता. विशेषत: ऑगस्ट महिन्यात एक हजार ९६८ रुग्ण आढळले होते व सर्वाधिक म्हणजे ४८ जणांचा मृत्यू झाला होता. तर सप्टेंबर २०२०मध्ये दोन हजार ५५९ रुग्ण आढळले आणि ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र पुन्हा जनजागृती आणि कायद्याचा बडगा सुरू झाल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आली. अगदी फेब्रुवारी २०२१पर्यंत रुग्णांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात होती. त्यामुळे सर्वकाही आलबेल झाल्यासारखे नागरिकांनीही सर्वच नियम धाब्यावर बसवले. प्रशासनानेही सवलत दिली. मात्र, १० मार्च २०२१नंतर मात्र कोरोना पुन्हा नियंत्रणाबाहेर गेला. याकाळात कोरोना चाचण्याही वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढू लागली. गेल्या मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ याकाळात फक्त २१ ऑगस्ट २०२०ला सर्वाधिक म्हणजे १९४ रुग्ण आढळले होते. मात्र, १२ मार्च २०२१पासून रोज २००पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातही गेल्या आठवड्यात ३००चा टप्पा पार झाला तर २१ मार्चला रोजच्या रुग्णांनी ४००चा टप्पा पार केला. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे.

एकीकडे लॉकडाऊनला वर्षपूर्ती होत असल्याने त्याच्या वेदनादायी स्मृतींना विसरण्याचा प्रयत्न होत असताना, रुग्णसंख्या तीनपटीने वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.