शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जिल्ह्यात ‘कोरोना’ ३०० च्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली आहे़ बुधवारी एकाच दिवशी २० जणांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली आहे़ बुधवारी एकाच दिवशी २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्या ३०४ झाली आहे़ दरम्यान बुधवारी पहाटे नंदुरबार शहरातील तुलसीविहारमधील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला़ यामुळे मयतांची संख्या १५ झाली आहे़तुलसीविहार येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाला सोमवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ प्रकृती खालावल्याने त्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते़ उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे वृद्धाचा मृत्यू झाला़ गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे़दरम्यान दुपारी १२ वाजेच्या अहवालात शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील २० वर्षीय युवक, म्हसावद रोडवरील २३ वर्षीय महिला, वृंदावन नगरातील २७ वर्षीय महिला तसेच पुसनद ता़ शहादा येथील आठ वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते़ सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ यात नंदुरबार शहरातील कोकणी हिल, रायसिंगपुरा, पाटीलवाडी, श्रॉफ हायस्कूल, मोठा माळीवाडा, सरस्वती नगर येथे प्रत्येकी १ तर पायल नगर व गिरीविहार सोसायटी येथे प्रत्येकी दोन, तळोदा शहरातील सुमन नगर व माळीवाडा येथे प्रत्येकी १, सोनवद ता़ शहादा, मंदाणा ता़ शहादा, गरीब नवाज कॉलनी आणि गांधीनगर शहादा येथे प्रत्येकी एक अशा १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ नव्याने समोर आलेल्या २० रुग्णांमुळे रुग्ण संख्या ३०४ झाली असून बुधवारी ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ सध्या जिल्हा रुग्णालयात ९९ जण कोरोनावर उपचार घेत आहेत़

४कोविड कक्षात नंदुरबार शहर व तालुक्यात सर्वाधिक ६८, शहादा २५, तळोदा २, नवापूर १, अक्कलकुवा २ तर धडगाव तालुक्यातील एक असे ९९ रुग्ण उपचार घेत आहेत़ बुधवारी तोरखेडा येथील ५, जिजाऊ नगर २, जिल्हा रुग्णालय १ तर नवापूर येथील जनता पार्कमधील १ रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे़

सात जुलै रोजी जिल्ह्यात रुग्णसंख्या ही २०० च्या आत होती़ सात रोजी रात्री एकाच वेळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्या २१६ झाली होती़ दरम्यान यानंतर कोरोनाबाधित समोर येण्याचा वेग वाढता राहिला आहे़ यातून ८ ते १५ जुलै या आठ दिवसांच्या काळात १०० रुग्ण समोर येऊन यातील पाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ नंदुरबार शहरात चार तर विसरवाडी येथील एका महिलेचा समावेश आहे़ रुग्ण संख्या वाढत असल्याने दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात रुग्णसंख्येने ३०० चा टप्पा पूर्ण झाला आहे़