शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

जिल्ह्यात ‘कोरोना’ ३०० च्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली आहे़ बुधवारी एकाच दिवशी २० जणांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली आहे़ बुधवारी एकाच दिवशी २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्या ३०४ झाली आहे़ दरम्यान बुधवारी पहाटे नंदुरबार शहरातील तुलसीविहारमधील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला़ यामुळे मयतांची संख्या १५ झाली आहे़तुलसीविहार येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाला सोमवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ प्रकृती खालावल्याने त्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते़ उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे वृद्धाचा मृत्यू झाला़ गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे़दरम्यान दुपारी १२ वाजेच्या अहवालात शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील २० वर्षीय युवक, म्हसावद रोडवरील २३ वर्षीय महिला, वृंदावन नगरातील २७ वर्षीय महिला तसेच पुसनद ता़ शहादा येथील आठ वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते़ सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ यात नंदुरबार शहरातील कोकणी हिल, रायसिंगपुरा, पाटीलवाडी, श्रॉफ हायस्कूल, मोठा माळीवाडा, सरस्वती नगर येथे प्रत्येकी १ तर पायल नगर व गिरीविहार सोसायटी येथे प्रत्येकी दोन, तळोदा शहरातील सुमन नगर व माळीवाडा येथे प्रत्येकी १, सोनवद ता़ शहादा, मंदाणा ता़ शहादा, गरीब नवाज कॉलनी आणि गांधीनगर शहादा येथे प्रत्येकी एक अशा १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ नव्याने समोर आलेल्या २० रुग्णांमुळे रुग्ण संख्या ३०४ झाली असून बुधवारी ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ सध्या जिल्हा रुग्णालयात ९९ जण कोरोनावर उपचार घेत आहेत़

४कोविड कक्षात नंदुरबार शहर व तालुक्यात सर्वाधिक ६८, शहादा २५, तळोदा २, नवापूर १, अक्कलकुवा २ तर धडगाव तालुक्यातील एक असे ९९ रुग्ण उपचार घेत आहेत़ बुधवारी तोरखेडा येथील ५, जिजाऊ नगर २, जिल्हा रुग्णालय १ तर नवापूर येथील जनता पार्कमधील १ रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे़

सात जुलै रोजी जिल्ह्यात रुग्णसंख्या ही २०० च्या आत होती़ सात रोजी रात्री एकाच वेळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्या २१६ झाली होती़ दरम्यान यानंतर कोरोनाबाधित समोर येण्याचा वेग वाढता राहिला आहे़ यातून ८ ते १५ जुलै या आठ दिवसांच्या काळात १०० रुग्ण समोर येऊन यातील पाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ नंदुरबार शहरात चार तर विसरवाडी येथील एका महिलेचा समावेश आहे़ रुग्ण संख्या वाढत असल्याने दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात रुग्णसंख्येने ३०० चा टप्पा पूर्ण झाला आहे़