शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

शहादा शहर व तालुक्यात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

मार्च महिन्यापासून शहरासह तालुक्यातील मंदाणे, डोंगरगाव, कोंढावळ, म्हसावद या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोजचे ...

मार्च महिन्यापासून शहरासह तालुक्यातील मंदाणे, डोंगरगाव, कोंढावळ, म्हसावद या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोजचे आकडे पाहता हा कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाला असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे सिद्ध होत आहे. प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत किराणा दुकान व भाजीपाला विक्रीला परवानगी दिली आहे. उर्वरित कालावधीत संचारबंदी जारी करण्यात आली असून गुरुवारी पहिल्या दिवशी दुपारी एक वाजल्यानंतर शहरात पोलिसांनी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर व मुदतीनंतर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केल्याने संपूर्ण शहरात शुकशुकाट होता.

शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने शहरातील सर्व खासगी हॉस्पिटल फुल्ल झाले असून अनेक रुग्णालयात ‘बेड उपलब्ध नाही’ असे बोर्ड लावल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिगंभीर रुग्णांनी गुजरात राज्यातील सुरत येथे उपचारासाठी दाखल होणे पसंत केले आहे. गेल्या आठ दिवसांत सुरतमधील अनेक हॉस्पिटलमध्ये शहरासह तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी शासकीय पातळीवर ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा अद्यापही उपलब्ध झालेली नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून परिस्थिती गंभीर झालेली असतानाही शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले नसल्याने नागरिकांना बाधितांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळै अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

प्रशासनातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी कोरोना संक्रमणाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत असल्याने हा नेमका कोणता कोरोना संक्रमणाचा स्ट्रेन आहे याचा शोध घेतला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ चाचण्यांची संख्या वाढवून संक्रमणाला थांबविणे शक्य होणार नाही तर यासाठी युद्धपातळीवर विशेष मोहीम बाधित रुग्ण आढळून येत असलेल्या गावांमध्ये, भागांमध्ये राबविण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्धरित्या कार्यक्रम राबविण्याची गरज आहे,असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता बाधित रुग्ण आढळून येत असले तरी मृत्यूची संख्याही आवाक्यात होती. तर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय होती. मात्र, मार्च २०२१ मध्ये बाधितांची संख्या वाढण्यासह या आजारामुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्याही कमालीची वाढली आहे. प्रशासनाने या गोष्टीचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

गेल्या १५ दिवसांत शहादा शहरातील अमरधाम येथे ६० पेक्षा अधिक मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दफनविधी करण्यात आलेल्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या मृतांमध्ये अनेक कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवरही अमरधाम येथे नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने अमरधामला वेटींग सुरू होती. अमरधाममधील कर्मचारी प्रताप ठाकूर व इतरांनी मृतांवर अंत्यसंस्काराचे कार्य अहोरात्र पार पाडले. अचानक मोठ्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडत असून यात इतर आजाराने व वृद्धापकाळाने मृत्यू पावलेल्यांचाही समावेश आहे.

दिवसभर रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजाने नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असल्याने आता प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. संचारबंदीच्या कालावधीत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम झाली तर याचा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना होणार असून याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.