शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

पेसा निधीवर जि.प.सदस्यांचेही नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 12:31 IST

स्थायी समिती सभा : सीईओंनी ग्रामपंचायतींसाठी काढलेला आदेश घेतला मागे

ठळक मुद्दे 11 शिक्षकांवर कारवाई करणार नर्मदा काठावरील शाळांमधील 11 शिक्षक अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या भेटीत गैरहजर आढळून आले होते. त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर संबधित शिक्षकांवर कारवाईचे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या निधीवर आता जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 29 सप्टेंबर रोजी काढलेला आदेश मागे घेतला असून ग्रामसेवकांच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद स्थायी समिती सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे, सभापती आत्माराम बागले, दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. पेसा कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी देण्यात आला आहे. तो खर्च करण्याबाबत काढलेल्या पत्राचा विषय सभेत चर्चेत आला. त्यावर बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवाडे यांनी सांगितले, हा निधी संबधीत ग्रामसेवक आपल्या मनमानीप्रमाणे खर्च करीत असल्याचे निदर्शनास आले होते. वास्तविक या निधीची जबाबदारी आणि इतर अनुषंगीक बाबींना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्याला तोंड द्यावे लागते. म्हणून 29 सप्टेंबर रोजी याबाबत सर्व ग्रामपंचायतींसाठी पत्र वजा आदेश पाठविला होता. परंतु त्याचा   विपर्यास करण्यात आला. परिणामी तो आदेश मागे घेतला. पेसाच्या निधीवर नियंत्रणासाठी जिल्हा    परिषद पदाधिकारी आणि     सदस्यांनी देखील लक्ष देणे गरजेचे असल्याचे बिनवाडे यांनी सांगितले. त्यावर सदस्यांचेही एकमत झाल्याने आता आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींवर सदस्य लक्ष ठेवणार आहेत.तीन कोटीचा निधीज्या ग्रामपंचायतींना इमारत नाही त्या ठिकाणी इमारती बांधकामासाठी तीन कोटी रुपये निधी मंजुर झाला आहे. एकुण सात कोटींची मागणी होती. ते सर्व मिळाले असून उर्वरित चार कोटींच्या कामांचे प्रस्ताव मागविण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांनी सांगितले.