शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

विकासात योगदान देणा:या सरपंचांना वाढीव मानधन द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरपंचांच्या प्रयत्नांनी ग्रामीण विकासाला चालना मिळते, परंतू त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने कामाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरपंचांच्या प्रयत्नांनी ग्रामीण विकासाला चालना मिळते, परंतू त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने कामाला मर्यादा आल्या आहेत़ यासाठी सरपंचांना मानधन वाढीचा सन्मान देण्याचा सूर सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला़ जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम पार पडला़ पंचायत राज विकास मंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नंदुरबार शाखेकडून याहामोगी सभागृहात हा मेळावा घेण्यात आला़ प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुडरूकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पुणे जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष सतीष जगताप, नाशिक विभागीय अध्यक्ष देवमन पवार, जिल्हाध्यक्ष राहुल गावीत, जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष आमशा पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा, याहामोगी माता, बिरसा मुंडा आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला़ प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राहुल गावीत यांनी केल़े मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी म्हणाले की, देशातील इतर कोणत्याही भागापेक्षा महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम आह़े यातून विकासाचा वेग वाढला आह़े मेळावे आणि कार्यशाळांना पदाधिका:यांनी हजेरी लावलीच पाहिज़े यातून विचारांचे आदानप्रदान होऊन विकासाचा वेग वाढणार आह़े जिल्ह्यात पेसामुळे येथील ग्रामविकासाचा वेग वाढला आह़े पंचायातींनी ग्रामसभांसोबतच वॉर्डसभा घेतल्यास शेवटच्या ग्रामस्थालाही योजना कळतील़  भरत गावीत यांनी, सरपंच हा ग्रामीण विकासाचा आत्मा आह़े पेसांतर्गत ग्रामपंचायतींना वाढीव निधी मिळत असल्याने त्या स्वयंभू झाल्या आहेत़ अनेक पंचायतींनी विकासात्मक कामे करुन कृती आराखडा सार्थ ठरवला आह़े अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे सरपंचांच्या ज्ञानात भर पडल़े  यातून विकास कामांना चालना मिळून फसवणूक होण्याचे प्रकारही होणार नाहीत़ सरपंचांनी तंटामुक्ती आणि दारुबंदीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितल़े जयंत पाटील यांनी, सरपंच हा गावाचा प्रमुख असतो, साध्याभोळ्या माणसाकडून ग्रामपंचायत चालवणे शक्यच नाही, यासाठी सक्षम माणसेच लागतात़ असा सक्षम माणूस घडवण्यासाठी सरपंच परिषद महाराष्ट्रभर कार्य करत आह़े सरपंचांचा सन्मान व्हावा हा प्रमुख मुद्दा आह़े यासाठी राज्यातील सर्वच सरपंचांचे मानधन वाढावे म्हणून सातत्याने परिश्रम घेत आह़े येत्या दोन महिन्यात होणा:या राज्याधिवेशनात याबाबत ठराव करुन मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि लोकप्रतिनिधींना देणार असल्याचे त्यांनी सांगितल़े