शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाणीपुरवठा व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचा:यांनी बेमुदत काम बंद केले असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाणीपुरवठा व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचा:यांनी बेमुदत काम बंद केले असून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात स्वच्छ भारत अभियान मोठय़ा प्रमाणात राबविले जात आहे. या कामात महाराष्ट्र शासनाने देशपातळीवर विविध पुरस्कार घेत देशात महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. स्वच्छतेची चळवळ ग्रामीण भागातून राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागअंतर्गत ‘वासो’ संस्थेकडून प्रत्येक जिल्हा परिषदअंतर्गत  पंचायत समितीत गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) स्थापन करण्यात आले आहे. यात काम करणारे कंत्राटी गटसमन्वयक, समूह समन्वयक कार्यरत आहेत. परंतु त्यांना अतिशय कमी आठ हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. गेल्या सात वर्षात स्वच्छतेच्या, जाणीव जागृती, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम, सार्वजनिक पिण्याचे पाणी गुणवत्ता स्त्रोतांचे मूल्यमापन, शौचालय वापराबाबत जनजागृती, स्वच्छता दर्पण असे विविध कार्यक्रम हे कर्मचारी यशस्वीपणे  राबवत असतानाही केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत कंत्राटी कर्मचा:यांची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. यामुळे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीत कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांनी शासनाचे लक्ष वेधत आपल्या समस्या सोडवण्यासाठी 4 सप्टेंबरपासून संपाचे हत्यार उपसले आहे.गटसमन्वयक व समूह समन्वयक यांना अनेक जिल्ह्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात चार-पाच महिन्यापासून मानधन मिळत नाही तर काही ठिकाणी अकरा महिन्यांची ऑर्डर संपूनही नवीन ऑर्डर मिळालेल्या नाहीत. यामुळे अल्प मानधनात काम करत असताना पंचायत समितीस्तरावरून गावपातळीवर फिरण्यासाठी त्यांना काही अपघात झाला तर कुठलाही अपघाती विमा किंवा उपचारासाठी आरोग्य विमा लागू नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. शासनामार्फत राबविल्या जाणा:या इतर योजनांतील कंत्राटी कर्मचा:यांना मिळणा:या  मानधनप्रमाणे मानधन मिळावे  यासाठी शासनस्तरावर आजवर कुठलाही मानधनाबाबत निर्णय होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेमार्फत पंचायत समितीत काम करणारे कंत्राटी कर्मचारी 4 सप्टेंबरपासून राज्यभरातून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार  मानधन वाढ मिळावी, वेळेवर मानधन मिळावे, अपघाती व आरोग्य विमा लागू करावा, सेवेत कायम करावे अशा विविध मागण्या घेऊन राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.