शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील नऊ गावांना दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:04 IST

हितेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रूपये खर्च केले ...

हितेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रूपये खर्च केले जात असले तरी अद्यापही अनेक गावात गावांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. शहादा तालुक्यात १५० ग्रामपंचायती आहेत. त्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची तपासणी केली असता १४१ ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य पाणी असल्याने हिरवे कार्ड तर नऊ गावातील पिण्याचे पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आल्याने या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. सुदैवाने तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीकडे लाल कार्ड नाही. दूषित पाणीपुरवठा करणाºया ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाºया स्रोतांचे पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. हा अहवाल नुकताच आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील १५० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतीचे पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त आहे. तर १४१ ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे अहवालावरून निष्पन्न झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साथीचे आजार पसरू नये याकरिता ग्रामपंचायतींकडून टीसीएल पावडरचा वापर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.ग्रामीण भागात शुद्ध पाणी मिळण्यासाठी फिल्टरचे पाणी पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे तर काही ग्रामस्थांची परिस्थिती पाहता पाण्याच्या जार विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नसून, ग्रामपंचायतीच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायतीकडून होणाºया दूषित पाणीपुरवठ्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांच्या नशिबी आजारपण येत असते. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावातील पिण्याच्या पाण्यात टीसीएल पावडर वापरत नसल्याचा प्रकार अनेकदा समोर येत असतो. आजही अनेक ठिकाणी नियमित टीसीएल पावडरचा वापर होत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढण्याची अधीक शक्यता असते. त्यामुळे साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यताही वाढते. या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी दूषित पाण्याची समस्या मिटलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोका कायम असतो.संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाण्याचे नमुने घेऊन पाण्याचा दर्जा ठरविण्यात येतो. त्यात पाण्याच्या दर्जानुसार संबंधित ग्रामपंचायतीला लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे त्या ग्रामपंचायतीला लाल, कमी दुषित पाण्याचा पुरवठा करणाºया ग्रामपंचायतीला पिवळे तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाºया ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड देण्यात येते.शहादा तालुक्यातील काहाटूळ, धांद्रे बुद्रूक, उभादगड, चिरखान, शहाणा, वडगाव, कोळपांढरी, टेंभली (आसूस), कुरंगी या नऊ ग्रामपंचायतींकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.