शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

पोस्टरद्वारे अवतरली संवैधानिक मूल्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समता, न्याय, स्वांतत्र्य व बंधुत्त्व या संैविधानिक मूल्यांची रुजवात करुन पिढी घडवण्याच्या उद्देशाने शांतीलाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समता, न्याय, स्वांतत्र्य व बंधुत्त्व या संैविधानिक मूल्यांची रुजवात करुन पिढी घडवण्याच्या उद्देशाने शांतीलाल मुथा फाउंडेशनकडून मूल्यवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे़ यांतर्गत जिल्हा मूल्यवर्धन मेळावा गुरुवारी शहरातील दादावाडीत घेण्यात आला़ मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांची मांडणी करत जाणीवांचा जागर केला़मेळाव्याचे उद्घाटन मुथा फाउंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ सेवाभावी शांतीलाल मुथा, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी डॉ़ कांतीलाल टाटिया, दिलीप कांकरिया, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी़आऱ रोकडे, डाएटचे प्राचार्य जालिंदर सावंत, गटशिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता राहुल औटी, विस्तार अधिकारी डॉ़ युनूस पठाण, शेखर धनगर, आऱबी़पाटील, मदनलाल सालेचा, नरेश कांकरिया, भवरलाल कोचर आदी मान्यवर उपस्थित होते़प्रारंभी शांतीलाल मुथा यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्रात १० वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या मूल्यवर्धन उपक्रमाची भूमिक मांडली़ बीड जिल्ह्यातून सुरु झालेला हा उपक्रम राज्यातील ६७ हजार शाळांमध्ये सुरु झाला होता़ यातून लाखो विद्यार्थी संवैधानिक मूल्य समजून घेत आहेत़ विद्यार्थ्यांमध्ये बदल झाला असून प्रामाणिकपणा आणि बंधुत्त्व रुजल्याची अनेक उदारहरणे देऊन नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार वर्षात सुरु असलेल्या उपक्रमाबाबत मुथा यांनी विस्तृत माहिती दिली़आमदार डॉ़ गावीत यांनी सांगितले की, एखाद्या ठिकाणी धर्म आणि जात याऐवजी न्याय, समता आणि बंधुत्त्व यांचे शिक्षण देण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे़ यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा येऊन दुसऱ्याला मदत करण्याची भावना निर्माण होते़ नंदुरबार जिल्ह्यात अशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे़ मूल्यवर्धनातून संस्कारीत झालेल्या पिढीचा या अशिक्षित बांधवांना लाभ मिळणार आहे़ शिक्षकांचे काम चांगले झाले आहे़ जिल्ह्यातील शाळांमध्ये मूल्यवर्धनामुळे शिक्षक दिसू लागले हे समाधानकारक आहे़ मुलांना इंग्रजी शिकवा हे कायम सांगत आलो आहे़ या कामामुळे जिल्ह्यात परीवर्तन होईल़मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग विद्यार्थ्यांसाठी नेहमी मुथा फाउंडेशनच्या सोबत असल्याचे सांगितले़मेळाव्यात मूल्यवर्धनाचे शिक्षण देणारे मास्टर ट्रेनर शिक्षक उपस्थित होते़ त्यांनी अनुभवकथन केले़ प्रत्येक शाळेत झालेल्या उपक्रमाची १२ मिनिटाची चित्रफित यावेळी प्रसारित करण्यात आली़ यानंतर व्हिडिओ क्लिप्समधील सादरीकरण, शाळांचे विषय यावर डायटचे प्राचार्य शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मूल्यवर्धन अधिकारी, तालुका आणि जिल्हा समन्वयक, एसएमएफ पदाधिकारी यांच्यात चर्चासत्र घेण्यात आले़ यातून मूल्यवर्धन उपक्रमातील विद्यार्थ्यांमधील अपेक्षित फलनिष्पत्ती आणि सहभाग या शैक्षणिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली़

४या जिल्हा मेळाव्यात २६९ जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध मूल्यांवर आधारित पोस्टर तयार करुन पाठवले होते़ सोबत ७५ व्हिडिओ याठिकाणी देण्यात आले़ यात व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अनुभवकथन करत समता, न्याय आणि बंधुत्त्व या मूल्यांची माहिती देत शालेय आणि ग्रामीण जीवनातील अनुभव सांगितले़ सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या पोस्टर्समुळे या मेळाव्यातील विषयांवर गांभिर्याने चर्चा झाली़ देशातील ज्वलंत विषयांना संविधान किंवा राज्यघटनेतील मूल्यांचा असलेला आधार चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे़ त्यांच्या या कल्पनाशक्तीला उपस्थितांनी दाद देत कौतूक केले़४चारवर्षापासून शांतीलाल मुथा फाउंडेशनकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत ९२ हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत़ त्यांना शिक्षण देणाऱ्या ३ हजार ३०० शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी २६७ मास्टर ट्रेनरची निवड करण्यात आली आहे़४दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवल्या जाणाºया या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाचा गुण रुजल्याचे सोदाहरण स्पष्ट करण्यात आले़ तसेच विद्यार्थी स्वच्छता आणि टापटीप तसेच शिस्तीकडे लक्ष देत असल्याचे व्हिडिओत दिसून आले़