शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

शिवभोजन थाळीमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सर्व कामधंदे बंद असून ...

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सर्व कामधंदे बंद असून जनजीवन ठप्प झाले आहे. रोजगार बंद झाल्याने आता खायचे काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शिवभोजन केंद्रांवर मोफत भोजन गरीब व कष्टकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. अशा संकटाच्या काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत लाभार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे. अशा गरजू कुटुंबांसाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रीत, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावला असला तरी या कालावधीत कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट दूर व्हावे, पूर्वीसारखे जनजीवन सुरळीत व्हावे व मानव जातीचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना कष्टकरी कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्रावर कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्यात येत असून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जात आहे. या केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीरातील तापमानाची मोजणी केली जात असून सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर लाभार्थ्यांना शिवभोजन मोफत देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणामुळे कोरोनापासून बचाव होण्यास मदत मिळते याबाबत जनजागृती केली जात आहे.

संचारबंदीमुळे कामधंदा बुडाला. टॅक्सी चालवून रोजगार मिळायचा. मात्र प्रवाशी अभावी टॅक्सी बंद आहे. अशाप्रसंगी शिवभोजन केंद्रावर मोफत मिळणारे भोजन महत्त्वाचा आधार ठरत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे काही दिवसासाठीचा रोटीचा प्रश्न सुटला आहे.

-दीपक गुरव, टॅक्सी चालक, शहादा

शहरात कोरोना विषाणू संक्रमणामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. चार-पाच घरांची धुणीभांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा . मात्र आता काही दिवसापासून कामधंदा बंद आहे. परिणामी आता पोट भरायचे कसे ही चिंता सतावत होती. अशा काळात शिवभोजन केंद्राची माहिती मिळाली, तेथे चांगल्या दर्जाचे भोजन मिळाले. यामुळे माझ्यासह कुटुंबीयांची काही दिवसाची चिंता मिटली आहे.

-सोनीबाई पवार, शहादा

लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा काळात गरीब कष्टकऱ्यांना हक्काचे भोजन मिळावे यासाठी राज्य शासनाने शिवभोजन केंद्रावरून मोफत भोजनाची व्यवस्था केल्याने याचा लाभ सर्वसामान्य गरीब जनतेला होत आहे. असा उपक्रम राबवून शासनाने कष्टकऱ्यांना संकट समयी मोठा आधार दिला आहे.

-दिनेश महाजन, चहा विक्रेता, शहादा