शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवभोजन थाळीमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सर्व कामधंदे बंद असून ...

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सर्व कामधंदे बंद असून जनजीवन ठप्प झाले आहे. रोजगार बंद झाल्याने आता खायचे काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शिवभोजन केंद्रांवर मोफत भोजन गरीब व कष्टकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. अशा संकटाच्या काळात मजूर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत लाभार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे. अशा गरजू कुटुंबांसाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रीत, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावला असला तरी या कालावधीत कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट दूर व्हावे, पूर्वीसारखे जनजीवन सुरळीत व्हावे व मानव जातीचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना कष्टकरी कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्रावर कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्यात येत असून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जात आहे. या केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीरातील तापमानाची मोजणी केली जात असून सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर लाभार्थ्यांना शिवभोजन मोफत देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणामुळे कोरोनापासून बचाव होण्यास मदत मिळते याबाबत जनजागृती केली जात आहे.

संचारबंदीमुळे कामधंदा बुडाला. टॅक्सी चालवून रोजगार मिळायचा. मात्र प्रवाशी अभावी टॅक्सी बंद आहे. अशाप्रसंगी शिवभोजन केंद्रावर मोफत मिळणारे भोजन महत्त्वाचा आधार ठरत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे काही दिवसासाठीचा रोटीचा प्रश्न सुटला आहे.

-दीपक गुरव, टॅक्सी चालक, शहादा

शहरात कोरोना विषाणू संक्रमणामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. चार-पाच घरांची धुणीभांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा . मात्र आता काही दिवसापासून कामधंदा बंद आहे. परिणामी आता पोट भरायचे कसे ही चिंता सतावत होती. अशा काळात शिवभोजन केंद्राची माहिती मिळाली, तेथे चांगल्या दर्जाचे भोजन मिळाले. यामुळे माझ्यासह कुटुंबीयांची काही दिवसाची चिंता मिटली आहे.

-सोनीबाई पवार, शहादा

लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा काळात गरीब कष्टकऱ्यांना हक्काचे भोजन मिळावे यासाठी राज्य शासनाने शिवभोजन केंद्रावरून मोफत भोजनाची व्यवस्था केल्याने याचा लाभ सर्वसामान्य गरीब जनतेला होत आहे. असा उपक्रम राबवून शासनाने कष्टकऱ्यांना संकट समयी मोठा आधार दिला आहे.

-दिनेश महाजन, चहा विक्रेता, शहादा