शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आजच्या देशव्यापी आंदोलनाला काॅंग्रेसचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

याबाबत दिलेल्या निवेदनात काॅंग्रेसतर्फे म्हटले आहे की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केलेले आहेत आणि कामगारांच्या ...

याबाबत दिलेल्या निवेदनात काॅंग्रेसतर्फे म्हटले आहे की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केलेले आहेत आणि कामगारांच्या विरोधामध्ये एक कायदा केलेला आहे. तसेच सध्या देशामध्ये पेट्रोलचा शंभर रुपये आणि डिझेल ८८ रुपये प्रति लीटरप्रमाणे विकले जात आहे. इतकी प्रचंड दरवाढ झाल्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता जवळजवळ १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेले असताना केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या आंदोलकांकडे दुर्लक्ष केलेले आहे. देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. कामगार कायद्यांमध्ये बदलामुळे आणि त्यामधील जाचक तरतुदींमुळे देशातील कामगार देशोधडीला लागणार आहे. कृषी कायद्यातील तरतुदींमुळे सर्वसामान्यांना मिळणारे रेशन बंद होणार आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांच्या विरोधात देशामधील शेतकरी संघटनांनी बंदचे भारत बंदचे आवाहन केलेले आहे. या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे. कोरोनाच्या नावाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस विभागाने काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारविरोधी तसेच सर्वसामान्यांच्या विरोधातील धोरणाचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. आंदोलनाला परवानगी दिली नाही म्हणून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला देत असल्याचे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक व सुभाष पाटील यांनी कळविले आहे.