केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या बेरोजगारी, पेट्रॉल, डिझेल, खाद्यतेल, गॅस, शेतीसाठीची बी-बियाणेच्या दरवाढीविरोधात नवापूर शहरातील काँग्रेस भवन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक, पंचायत समिती सदस्य ललीता वसावे, दिलीपसिंग वसावे, धिरसिंग गावित, चिंचपाडा गावाचा सरपंच नम्रता वळवी, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे, माजी नगरसेवक विनय गावित, तानाजी वळवी, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरिया, भारती वसावे, सुनीता वसावे, मोहमदजी मुल्ला, फैजल शेख, तुराफ पठाण, अविनाश वळवी, किरण वळवी, अजित वळवी, अविनाश वसावे, रहेमतखा पठाण, संजय मोरे, योगेश मावची, बैजूमलिकसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी कोरोना महामारीच्या अनुषंगाने तोंडाला मास्क व फिजिकल अंतर ठेवून सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.
तळोदा
तळोदा तालुका काँग्रेस पक्षातर्फे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार गिरीश वाखारे यांना वाढत्या महागाई संदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता त्रस्त झाली असून, अशा प्रसंगी लोकांना मदत करणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वाढदिवसी संकल्प दिन साजरा करीत कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नावर केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन केले. याप्रसंगी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी सांगितले की, एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, तर महागाई का रोखू शकत नाही, अशी संतप्त भावना व्यक्त केली. या निवेदनावर माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सीमा वळवी, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष प्रवीण वळवी, नरहर ठाकरे, मोहन ठाकरे, जितेंद्र माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, नंदुगीर गोसावी, सुरेश इंद्रजित, धर्मेंद्र वळवी, भावजी पाडवी, किसन ठाकरे, सचिन राहासे, विनोद पाडवी, सोमनाथ साळवे, लक्ष्मण कोळी, जयसिंग वसावे आदींच्या निवदेनावर सह्या आहे.