शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तळोदा-प्रतापपूर-मालदा रस्त्यावरील स्थिती; वाहतुकीला ठरताहेत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

रस्ता निर्मितीचे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले किंवा नाही, हे तपासणीचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभाग म्हणजेच क्वाॅलिटी ...

रस्ता निर्मितीचे काम झाल्यानंतर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले किंवा नाही, हे तपासणीचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभाग म्हणजेच क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात येते. ते तपासण्यासाठी कामात वापरलेल्या मुरूम, खडी डांबर यांचे नमुने घेतले जातात. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी विशिष्ट आकाराचे खड्डे तयार करून नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांचा आधार घेत रस्त्याचा दर्जा निश्चित करण्यात येतो.

याचप्रकारचे नमुने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या तळोदा-प्रतापपूर-मालदा या रस्त्यावर ठिकठिकाणी घेण्यात आले. नमुन्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी साधारणत: एक ते सव्वा फुटाचे चौकोनी खड्डे तयार करून रस्त्याची गुणवत्ता तपाणसीसाठी नमुने घेतले गेले. रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी क्वॉलिटी कंट्रोल विभागाने रस्त्याची गुणवत्ता तपासणी केल्याने नागरिकांनादेखील सुखद धक्का बसला. मात्र त्यानंतर क्वॉलिटी कंट्रोल विभागाने रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी तयार केलेल्या या खड्ड्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नंतर मात्र या खड्ड्याचे धक्केच खावे लागत असल्याची स्थिती आहे.

रस्त्याचे नमुने घ्यायला तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या खड्ड्यांचा प्रशासनाला विसर पडला आहे. अद्याप हे खड्डे बुजविण्यात आले नसून, हे खड्डे वाहतुकीला अडसर ठरत आहेत. या खड्ड्यांतून घेतलेल्या नमुन्यांमध्ये नंतर फक्त खडी भरली असल्याने ती निघून एक सव्वा फूट चौरस व तीन-चार इंच खोल खड्डे झाले आहेत. वाहनधारकांच्या लक्षात हे खड्डे येत नसल्याने त्यात वाहने अडकली जातात. त्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत.

या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष घालून वाहतुकीस अडथडे ठरणारे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

हे खड्डे प्रथमदर्शनी लक्षात येत नाहीत. तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील हे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. - पन्नालाल पावरा, नागरिक, प्रतापपूर