शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

वर्षभरात जलयुक्तची दीड हजार कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:32 IST

27 कोटी रूपयांचा खर्च : 454 कामे अद्यापही सुरू असल्याचा दावा

नंदुरबार : जिल्ह्यातील 104 गावांमध्ये 2017-18 या वर्षात जलसंधारणाची 2 हजार 228 कामे घेण्यात आली होती़  यातील 1 हजार 585 कामे आजअखेरीस पूर्ण झाल्याची माहिती आह़े या कामांबाबत सातत्याने झालेल्या तक्रारी आणि चौकशीचे गोपनिय अहवाल यामुळे गेल्या वर्षात जलयुक्त योजना चर्चेत होती़ 9 विभागांनी ही कामे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाचा आह़े   राज्यात 2015-16 या आर्थिक वर्षापासून जलयुक्त शिवाराची कामे सुरू करण्यात आली होती़ जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात 2 हजार 817 कामे जलयुक्तच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती आह़े कृषी विभाग, लघुसिंचन, जलसंधारण, वनविभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सव्रेक्षण यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या 9 विभागांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ही कामे राबवण्यात आली होती़ अनघड दगडी बांध, कंपार्टमेन्ट बंडीग, कोल्हापूर टाईप बंधारा/साठवण बंधारा दुरुस्ती, खोल सलग समतल चर, सिमेंट बंधारा/माती नाला बांध याच्यातून गाळ काढणे, गॅबियन बंधारे, जुने सिमेंट काँक्रिट नाला बांध, जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व माती नाला बांध, नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, मातीचा बांध बांधणे, नैसर्गिक जलस्त्रोत बळकटीकरण, पुर्नभरण चर यासह विविध प्रकारची कामे या विभागांकडून पूर्ण झाल्याची माहिती आह़े यासाठी गेल्या वर्षात 27 कोटी 55 लाख 58 हजार रूपयांचा खर्च केल्याची माहिती आह़े 2017-18 या वर्षात कृषी विभाग 1 हजार 120, लघुसिंचन 235, जलसंधारण 170, वनविभाग 125, सामाजिक वनीकरण 11, भूजल सव्रेक्षण विभाग 239, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि नरेगा 127 तर इतर विभागांकडून 12 जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली होती़ या 2 हजार 39 कामांपैकी 2 हजार 161 कामांना प्रथम मान्यता देण्यात आली होती़ यातील 2 हजार 119 कामांना कार्यारंभ आदेश दिले गेल़े ही कामे सुरू झाल्यानंतर 1 हजार 585 कामे पूर्ण तर 454 कामे अद्यापही प्रगती पथावर असल्याचे सांगण्यात आले आह़े एकीकडे प्रशासनाने गेल्या वर्षात विविध विभागांकडून कामे पूर्ण करून घेतल्याचे म्हटले असले तरी यात कृषी विभागाने 107 कामे रद्द केली होती़ ही कामे रद्द करण्याची माहिती ही प्रशासकीय पातळीवर दिली गेली असल्याचे सांगण्यात आले आह़े याचप्रकारे वनविभागाने 35 कामे अद्यापही सुरूच केलेली नाहीत़ यामुळे जलयुक्तची 174 मंजूर असलेली कामे रखडली आहेत़  येत्या वर्षात विविध 9 विभागांकडून 189 गावांमध्ये जलयुक्त अभियानाची तयारी सुरू झाली आह़े यानुसार अंतिम आराखडा तयार करण्याच्या कामेही अंतिम टप्प्यात आहेत़ जिल्ह्यात गेल्या 2015 ते 2017 या काळात 3 हजार 3 हजार 72 कामांचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला होता़ यात 3072 कामांना प्रथम मान्यता देण्यात आली होती़ यातील 2 हजार 817 कामे नोव्हेंबर 2017 र्पयत पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवले होत़े परंतू यातील 255 कामे आजही अपूर्ण असल्याची माहिती असून नेमक्या कोणत्या विभागातील कामांना गती मिळालेली नाही़ याबाबत माहिती प्रशासनाकडून कडून मिळालेली नाही़अक्कलकुवा तालुक्यात गत तीन वर्षात मंजूर 814 कामांपैकी 777 पूर्ण तर 37 अपूर्ण आहेत़ धडगाव तालुक्यात 2015 ते 2017 या काळात केवळ 60 कामे मंजूर होती़ यातील 49 पूर्ण तर 11 अपूर्ण आहेत़ नंदुरबार 442 पैकी 369 पूर्ण तर 73 अपूर्ण आहेत़ नवापूर 1 हजार 169 पैकी 1 हजार 54 पूर्ण तर 115 कामे अद्यापही सुरूच आहेत़ तर शहादा तालुक्यात 587 पैकी 568 कामे पूर्ण असून 19 कामे अपूर्ण असल्याचा दावा करण्यात आला आह़े 2017-18 या वर्षात धडगाव तालुक्यात 18, नंदुरबार 21, शहादा 15, तळोदा 8, अक्कलकुवा 20 तर नवापूर तालुक्यातील 22 गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ या गावांमध्ये 1 हजार 585 कामांना पूर्णत्त्व आल्याचे सांगण्यात आले आह़े