लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मंगळवार १६ ते शुक्रवार १९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नंदुरबार शहरातील बाजार व इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार शहरातील उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप पोलीस अधिक्षक रमेश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.डी. बोडके, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी अशोक पटाईत आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना व पेट्रोल पंप सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू राहतील. शासकीय कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. औषधांची दुकाने व दवाखाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहीतल. त्यासाठी वरील वेळेचे बंधन असणार नाही. शहरातील नागरिकांना दुपारी १२ नंतर कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाऊ नये. अत्यावश्यक कामांसाठी केवळ दिलेल्या वेळेतच बाहेर पडावे. मास्क न घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाºया दुकानदारांवर गुन्हे दाखल करावे. त्यासाठी नगरपालिकेने पथकांची संख्या वाढवावी. जिल्ह्याच्या सीमेवर कडकपणे तपासणी करण्यात यावी.चारही दिवस शासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वगळता कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी व नागरिकांना त्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात यावी.या क्षेत्रात नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी दिवसातून एकदा भेट देऊन पाहणी करावी. शहरातील सर्व रस्त्यावर बॅरेकेडींग करण्यात यावे. केवळ मालवाहतूकीसाठी जिल्ह्याबाहेर जाणारे रस्ते सुरू ठेवण्यात यावे.जिल्ह्यातील इतर शहरातही नगर पालिका प्रशासनाने नियमांचे पालन न करणाºयांविरोधात कडक कारवाई करावी. नागरिकांनी सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. जिल्ह्याबाहेरून दररोज ये-जा करणाºया अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.मुंबईसारख्या रेडझोनमधून येवून कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. परवाना नसतांना जिल्ह्यात किंवा संबधीत गावात, शहरात आल्यास संबधीतांची चौकशी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत.आरोग्य विषयक कामासाठी आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकाºयांनी गुन्हे दाखल करण्यासाठी संबधीत ठिकाणी प्राधिकृत अधिकाºयांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. संबधीत अधिकाºयांनी चौकशी करून थेट गुन्हे दाखल करण्यात यावे असेही निर्देश दिले आहेत.
नंदुरबारात पुन्हा आजपासून ४ दिवस संपुर्ण लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 11:59 IST