शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेती साहित्याच्या चोरीबाबत गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:34 IST

नंदुरबार जिल्ह्यात दररोज शेतकऱ्यांचा शेतातील इलेक्ट्रिक मोटारी, बोअरवेलमधून सबमर्शिबल मोटारी, केबल-वायरी, वीज कंपनीच्या तारा, पाइप, स्टार्टर, मेन स्वीच, लोखंडी ...

नंदुरबार जिल्ह्यात दररोज शेतकऱ्यांचा शेतातील इलेक्ट्रिक मोटारी, बोअरवेलमधून सबमर्शिबल मोटारी, केबल-वायरी, वीज कंपनीच्या तारा, पाइप, स्टार्टर, मेन स्वीच, लोखंडी व प्लास्टिकचे साहित्य चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र, चोरट्यांचा तपास लागत नाही. उलट चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही चोऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. अत्यंत महागडे साहित्य चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रकाशा येथे आठ दिवसांत दोन शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेल्या. शहादा तालुक्यातील नांदरखेडा, धूरखेडा येथील शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात चोरी झाली. या चोऱ्यांचे प्रमाण बघता पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिला नसल्याचेच दिसून येते. प्रकाशा येथे वर्षभरापूर्वी इलेक्ट्रिक मोटार दुरुस्तीचे दुकान फोडून १२ मोटारी चोरून नल्या होत्या. या चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारी, केबल, पाइप व इतर साहित्याच्या चोरीसह पिकांचे नुकसान करण्याच्या घटना घडतात. या घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान करणाऱ्या व शेती साहित्याची चोरी करणाऱ्यांसह हे साहित्य विकत घेणाऱ्यांचा पोलिसांनी त्वरित तपास लावून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले साहित्य आठ दिवसांत परत मिळाले नाही, तर शेतकरी नाइलाजाने बेमुदत उपोषणाला बसतील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक (नाशिक), जिल्हा पोलीस अधीक्षक (नंदुरबार), उपविभागीय पोलीस अधिकारी (शहादा), पोलीस निरीक्षक (शहादा) यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

माझ्या शेतातून दोन महिन्यांत दुसऱ्यांदा शेती साहित्याची चोरी झाली. शेतातील इलेक्ट्रिक मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. पाइपही कापून नेले आहेत. शेती साहित्याच्या चोरीच्या घटना जिल्हाभरात वाढल्या आहेत. याबाबतची तक्रार आम्ही गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.

-हरी दत्तू पाटील, चेअरमन, वि.का. सोसायटी, प्रकाशा