शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमणामुळे ढगाळ हवामानाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:58 IST

रब्बीला फटका : थंड व बाष्पयुक्त वा:यांचा परस्पर विरोधी प्रभाव

नंदुरबार : उत्तरेकडून येणारे थंड वारे व दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्यात द्रोणीय भागाची निर्मिती होऊन परिणामी निर्माण झालेल्या संक्रमणामुळे 28 ते 30 जानेवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता वर्तविण्यात येत आह़े बंगालच्या उपसागरात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ निर्माण झाल्याने दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहेत़ त्याच वेळी उत्तरेकडूनही थंड वारे दक्षिणेकडे वाहत आहेत़ यामुळे थंड व गरम (बाष्पयुक्त) वारे  ज्या प्रदेशात एकमेकांना आदळतील त्या ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आह़े सध्या असे वातावरण प्रामुख्याने विदर्भात निर्माण झाले असून अद्यापतरी उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा धोका नसल्याचे हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे व पुणे येथील हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आह़े  सध्या विदर्भातील काही भाग वगळता उर्वरीत महाराष्ट्रात थंडीची लाट हळुहळु ओसरत आह़े थंडीच्या  परतीच्या प्रवासात अनेक वेळा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ निर्माण होत असतो़ दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे उलटय़ा दिशेने वाहत असल्याने या सर्व वातावरणीय बदलांना संक्रमणाचा कालावधी म्हटला जात असतो़ अनेक वेळा यामुळे काही भागात तुरळक पावसाची शक्यताही वर्तविण्यात येत असत़े तथापि बहुतेक वेळा अशी स्थिती निर्माण होत असते, परंतु यातून अवकाळी पाऊस पडतोच असे नसल्याचे मत हवामानतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़े सध्या विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात थंडी ओसरताना दिसून येत आह़े जानेवारीनंतर ब:यापैकी किमान तापमानात वाढ होणार आह़े  दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका नसला तरी वातावणीय बदलामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत़ तसेच उत्तरेकडील प्रदेशांमध्ये अद्यापही कमी अधिक प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने तेथूनही थंड वारे वाहत आहेत़ खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने याचा रब्बी पिकांवर काय परिणाम होणार याबाबत धुळे येथील कृषी विभागाचे कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ़ मुरलीधर महाजन यांना बोलते केले असता ते म्हणाले, सलग तीन ते चार दिवस ढगाळ हवामान राहिल्यास याचा सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसण्याची शक्यता आह़े हरभ:यावर घाटेअळी तर गव्हावर गेरवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आह़े या दरम्यान पाऊस झाल्यास तो किती प्रमाणात पडतो यावर फायदा व नुकसानीचे गणित अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितल़े तुरळक पाऊस झाल्यास याचा पिकांना फायदा होणार आह़े दरम्यान, नाशिकसारख्या द्राक्षबागायती जिल्ह्यात केवळ ढगाळ वातारवणामुळेच द्राक्षाला मोठय़ा प्रमाणात धोका आह़े