शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

भराव खचल्याने आहवा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापुरात संततधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरी पावसाची दहशत मात्र कायम आहे. उकाळापाणीजवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापुरात संततधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरी पावसाची दहशत मात्र कायम आहे. उकाळापाणीजवळ रस्त्याचा भराव खचल्याने आहवामार्गे गुजरातमधील वाहतूक ठप्प झाली आहे तर खोकसा प्रकल्पास गळती लागल्याने धरण फुटीची भीती कायम आहे. गेल्या तीन दिवसापांसून तालुका संततधार पावसाने जलमय झाला होता. रविवारी एकाच दिवसात 328 मिलीमीटर असा विक्रमी पाऊस पडला. रंगावली नदीवरील पुलावरुन व प्रतापपूर येथील पुलावरील वाहतूक   सोमवारी सुरळीत झाली.  नगराध्यक्षा हेमलता पाटील, तहसीलदार सुनिता ज:हाड, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी रंगावली नदीकिनारी असलेल्या वस्त्यांमधे पाहणी केली. नदीकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांमधे आजही भीती पहावयास मिळाली.सोमवारी परिवहन सेवा पूर्ववत झाल्याने शहरात वर्दळ दिसून आली. आहवाकडे जाणा:या राज्य मार्गावर उकाळापाणी या जंगल क्षेत्रात रस्त्याचा भराव खचल्याने आहवाकडे वाहनांची ये-जा बंद झाली. नवापूर आहवा राज्यमार्ग पूर्णत: बंद झाला. भरडू येथील नागन प्रकल्प भरला असून प्रकल्पाच्या चारपैकी एक दरवाजा खुला करुन पाणी सोडण्यात आले.  धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.    दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी दुपारी रंगावली नदीवरील नयीहोंडा भागातील पुलाजवळून पुराच्या पाण्यात  वाहून गेलेल्या शकुर शेख चांद काकर या 55 वर्षीय अपंग वृद्धाचा मृतदेह गुजरातमधील वंजारी गावाजवळील उकाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मिळून आला. बोरपाडा गावाजवळील खोकसा येथील प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर भगदाड असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरणफुटीची भीती व्यक्त होत आहे. धरण फुटल्याची अफवा रविवारीच पसरली होती. विसरवाडी येथील सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी रविवारी सायंकाळीच खोकसा येथे जाऊन प्रकल्पाची पाहणी केली. संबंधित विभागाचे तज्ञ व अधिकारी नसल्याने त्यांनी दिलेल्या भेटीबाबत तहसीलदार यांना अवगत करुन दिले. गेल्यावर्षीही असाच प्रकार घडला होता. खोकसा प्रकल्पाचे पाणी नागङिारी प्रकल्पात येते. नागङिारी प्रकल्प आधीच पूर्णत: भरला आहे. त्यातच खोकश्याचे पाणी नागङिारी प्रकल्पात आल्यास मोठा अनर्थ घडेल. नागङिारी ते नवापूरदरम्यान असलेल्या अनेक गावांना त्याची झळ बसेल, अशी स्थिती असल्याने खोकसा धरण फुटीच्या अफवा व शक्यतेबाबत संबंधित विभागाने सजग राहून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.