शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नवापूर, खांडबारा व विसरवाडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:05 IST

आदिवासी संघटना एकवटल्या : धनगर समाजाला सवलती देण्याच्या निर्णयाला विरोध

नवापूर : धनगर समाजाला अप्रत्यक्षरित्या अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाच्या जाहीर निषेधार्थ मंगळवारी नवापूर शहर व तालुक्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. आदिवासी समाज व आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी या बंदचे आयोजन केले होते. व्यापा:यांनी 100 टक्के व्यवहार बंद ठेवले होते. दरम्यान, तालुक्यातील खांडबारा व विसरवाडी येथेही बंद पाळण्यात आला.धनगर समाजाला देऊ केलेल्या सवलतीसंदर्भात नवापूर तालुका आदिवासी समाजातर्फे पालिका सभागृहात पत्रकार परिषदेचे         आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, दिलीप नाईक, पालिकेचे गटनेते गिरीश गावीत,  राष्ट्रवादीचे राया मावची, पं.स.चे माजी सभापती विनायक गावीत, काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष आर.सी. गावीत, मनोज वळवी,           रॉबेन नाईक व सहकारी उपस्थित होते. या वेळी दिलीप नाईक यांनी  सांगितले की, धनगर समाजाला आधीच तीन टक्के आरक्षण            असताना आदिवासी समाजासाठी असलेल्या साडेसात टक्के आरक्षणातून सवलती देण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा प्रय} कोणत्याही परिस्थितीत आदिवासी समाज खपवून घेणार नाही. शासनाच्या या धोरणाला हाणून पाडण्यासाठी सर्व समाज संघटीत होऊन तीव्र लढा दिल्याशिवाय राहणार नाही. केंद्र व राज्य शासन जे करु शकत नाही ते न्यायालयाच्या माध्यमातून भाजप सरकार षडयंत्र करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भरत गावीत म्हणाले की, आदिवासींच्या सर्व योजना बंद करण्यामागे राज्यातील भाजप सरकार लागले आहे. त्यामुळे आदिवासींच्या न्याय हक्कावर गदा आलेली आहे. म्हणून सर्व आदिवासी समाज संघटीत होऊन आदिवासीविरोधी निर्णय रद्द करण्यासाठी तिव्र लढा उभारणार आहे. शासनाचा कुटील डाव हाणून पाडल्याशिवाय आदिवासी समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आर.सी.गावीत म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण वाढवून दिल्यास आदिवासी समाजाचा विरोध नाही. पंरतु धनगर समाजाला  आदिवासींच्या सवलती देऊ नये. घटनेने दिलेले अधिकार, न्याय हक्क व संविधान वाचविण्यासाठी आदिवासी समाज संघटीत होऊन सरकारच्या विरोधात लढा उभा करुन आदिवासी विरोधी निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडू, असे सांगितले.नवापूर बंद शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, संदीप पाटील व सहकारी पोलीस कर्मचा:यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा येथेही शांततेत बंद पाळण्यात आला.