शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर, खांडबारा व विसरवाडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:05 IST

आदिवासी संघटना एकवटल्या : धनगर समाजाला सवलती देण्याच्या निर्णयाला विरोध

नवापूर : धनगर समाजाला अप्रत्यक्षरित्या अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाच्या जाहीर निषेधार्थ मंगळवारी नवापूर शहर व तालुक्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. आदिवासी समाज व आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी या बंदचे आयोजन केले होते. व्यापा:यांनी 100 टक्के व्यवहार बंद ठेवले होते. दरम्यान, तालुक्यातील खांडबारा व विसरवाडी येथेही बंद पाळण्यात आला.धनगर समाजाला देऊ केलेल्या सवलतीसंदर्भात नवापूर तालुका आदिवासी समाजातर्फे पालिका सभागृहात पत्रकार परिषदेचे         आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, दिलीप नाईक, पालिकेचे गटनेते गिरीश गावीत,  राष्ट्रवादीचे राया मावची, पं.स.चे माजी सभापती विनायक गावीत, काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष आर.सी. गावीत, मनोज वळवी,           रॉबेन नाईक व सहकारी उपस्थित होते. या वेळी दिलीप नाईक यांनी  सांगितले की, धनगर समाजाला आधीच तीन टक्के आरक्षण            असताना आदिवासी समाजासाठी असलेल्या साडेसात टक्के आरक्षणातून सवलती देण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा प्रय} कोणत्याही परिस्थितीत आदिवासी समाज खपवून घेणार नाही. शासनाच्या या धोरणाला हाणून पाडण्यासाठी सर्व समाज संघटीत होऊन तीव्र लढा दिल्याशिवाय राहणार नाही. केंद्र व राज्य शासन जे करु शकत नाही ते न्यायालयाच्या माध्यमातून भाजप सरकार षडयंत्र करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भरत गावीत म्हणाले की, आदिवासींच्या सर्व योजना बंद करण्यामागे राज्यातील भाजप सरकार लागले आहे. त्यामुळे आदिवासींच्या न्याय हक्कावर गदा आलेली आहे. म्हणून सर्व आदिवासी समाज संघटीत होऊन आदिवासीविरोधी निर्णय रद्द करण्यासाठी तिव्र लढा उभारणार आहे. शासनाचा कुटील डाव हाणून पाडल्याशिवाय आदिवासी समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आर.सी.गावीत म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण वाढवून दिल्यास आदिवासी समाजाचा विरोध नाही. पंरतु धनगर समाजाला  आदिवासींच्या सवलती देऊ नये. घटनेने दिलेले अधिकार, न्याय हक्क व संविधान वाचविण्यासाठी आदिवासी समाज संघटीत होऊन सरकारच्या विरोधात लढा उभा करुन आदिवासी विरोधी निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडू, असे सांगितले.नवापूर बंद शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, संदीप पाटील व सहकारी पोलीस कर्मचा:यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा येथेही शांततेत बंद पाळण्यात आला.