शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्क उल्लंघनाचा दावा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील कालीबेल येथे शुक्रवारी जनसुनवाई घेण्यात आली. या वेळी दुर्गम पाडय़ातील रहिवाशांनी पाणीटंचाई आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील कालीबेल येथे शुक्रवारी जनसुनवाई घेण्यात आली. या वेळी दुर्गम पाडय़ातील रहिवाशांनी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना राबविण्यात येत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने या प्रकरणी न्यायालयात मानवी हक्क  उल्लंघनाची केस दाखल करण्याचा निर्णय जनसुनावणीत घेण्यात    आला.तळोदा तालुक्यातील कालीबेल येथे लिगर नेक्टस् पुणे व लोकसंघर्ष मोर्चा यांच्या वतीने जाहीर सुनवाई आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कायदेतज्ज्ञ अॅड.असीम सरोदे, अॅड.अनिरूद्ध कोटगीरे, अड.मंदाण लांडे, अॅड.श्वेता दुगड, अॅड.हर्षल काटीकर, अॅड.नहुष शुक्ल, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे डी.एल. बडगुजर आदी  उपस्थित होते. या वेळी जनसुनवाईत प्रतिभा शिंदे यांनी माहिती देतांना सांगितले की, कुयलीडाबर, चिरमाळा, पालाबार या गावांना दळणवळणाचा रस्ता नाही. त्यामुळे गावातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलाच पर्याय नाही. पाण्यासाठी लोकांबरोबरच जनावरांचीही प्रचंड परवड होत आहे. याबाबत महिनाभरापासून शासनाकडे सातत्याने धरणे आंदोलने, बैठकांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहेत. तरीही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. आता तर झरेही आटल्यामुळे पाण्याचा प्रश्न भीषण बनला आहे. प्रशासनाने गाढवावरून पाणी पोहोचविण्याचा निर्णय    घेतला असला तरी ते पुरेसे मिळत नाही. प्रति माणशी केवळ तीनच  लिटर पाणी सद्या नागरिकांना मिळत आहे. उपचाराअभावी वाटेतच रुग्णांचा जीव गेल्याचा व गर्भवतींची प्रसुती झाल्याचे अनेक उदाहरणे त्यांन दिलेत. या वेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या अधिका:यांनी पाणीटंचाईची समस्या असल्याचे मान्य करून रस्त्याअभावी उपाययोजनादेखील करता येत नसल्याचे मान्य केले. यावर रस्त्यांची कामे व पाणीपुरवठय़ाचे नियोजन प्रस्तावित केले असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड.असीम सरोदे यांनी नागरिक व प्रशासन या दोघांचेही म्हणणे ऐकून घेत हे सारे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. शासन अतिशय बेपर्वाहीने याकडे बघत असून, प्रश्न सोडवायला फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. याबाबत सविस्तर अहवाल   तयार करून संबंधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यंत्रणेकडे ते सादर   करुन. शिवाय याबाबतीत शासनाविरोधात न्यायालयातही केस दाखल करण्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.सूत्रसंचालन निशांत मगरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन दिलवर वळवी व बुधा पाडवी यांनी केले   होते. या कार्यक्रमास कुयलीडाबर, माळखुर्द, पालाबार, लक्कडकोट, रापापूर, चिडीमाळ, कालीबेल, जांभाईपाडा या गावांमधील  गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित  होते. जनावरांच्या चारा छावणीदेखील 25 मे र्पयत सुरू करण्याचे लेखी देवूनही अजून पावेतो चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. अशा अनेक समस्या त्यांनी मांडल्यात. याशिवाय खेमा वळवी, संभू वसावे, मुळीबाई वळवी, कालूसिंग पाडवी, मधुकर वळवी, रतन पाडवी, इमा वसावे, राजेंद्र पाडवी, सोमा वळवी, दिलवर वळवी आदींनीही आपल्या गावातील प्रश्न मांडलेत. रस्त्याअभावी रुग्णांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झोळीतून न्यावे लागत असल्याच्या तक्रारीदेखील जनसुनवाई पुढे मांडण्यात आल्यात.