शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गावे पाणीदार करण्यासाठी शहाद्यातील ग्रामस्थ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 12:05 IST

शहादा तालुका : 26 गावांतील ग्रामस्थांना प्रशिक्षण, महिलांचा लक्षणीय सहभाग

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थ गावपातळीवर पाण्याचा प्रत्येक थेंब जिरविण्यासाठी सज्ज होत आहेत. तालुक्यातील 26 गावातील लोकांनी पाणी फाऊंडेशनतर्फर्ेे दिले जाणारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन गावात प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. दरम्यान, या उपक्रमांतर्गत गावाच्या विकासासाठी महिलांचा सहभाग वाढत आहे.महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशन काम करीत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशनने काम उभे केले आहे. शहादा तालुक्यातील 60 गावांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. पैकी 10 गावांनी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणा:या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवल्याने असलोद, उधळोद, कहाटूळ, काकर्दा दिगर, चिखली बुद्रुक, पिंपर्डे, लोंढरे, सावखेडा, सावळदा व हिंगणी ही 10 गावे या स्पर्धेतून बाद झाली आहेत. आवगे, ओझर्टा, कमरावद, कवठळ, कवळीथ, कुकावल, कोंढावळ, कोठली त.सा., खेडदिगर, गोगापूर, चिखली खुर्द, चिरखान, जाम, जुनवणे, नवलपूर, पळसवाडा, बिलाडी त.सा.,  बिलाडी त.ह., मलगाव, वडाळी, वाडी, श्रीखेड, सोनवद त.श. व वडगाव या 24 गावांचे प्रशिक्षण अजून बाकी आहे. अनरद, गोदीपूर, धांदरे बुद्रुक, ब्राrाणपुरी, मंदाणे, मोहिदे त.श., मोहिदे त.ह., शोभानगर, होळगुजरी, चांदसैली, तिधारे, दामळदा, दोंदवाडा, नवानगर, निंभोरा, बामखेडा त.त., बोराळे, भुलाणे, भोंगरा, मातकुट, मानमोडय़ा, लंगडी भवानी, लक्कडकोट, शहाणा, सुलतानपूर व दुधखेडा या 24 गावांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने या  गावांमध्ये विविध कामांना सुरुवात झाली आहे.अनेक गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेबाबत रॅली, ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लंगडीभवानी येथे पर्यावरण बचावसाठी ढोल वाजवत व विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप ग्रामसभेत करण्यात आला. या वेळी सुमारे 500 ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच राजेंद्र पावरा, रवींद्र पावरा, शर्मिला पावरा, रमेश पावरा यांनी गावक:यांचे स्वागत केले. बोराळे येथेदेखील ग्रामसभा होऊन वॉटरकप स्पर्धेबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. स्पर्धेपूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून वृक्षारोपण, शोषखड्डे, रोपवाटिका, माती  परीक्षण या कामांना जोरात सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही गाव विकासासाठी पदर खोचल्याने महिलांचा सहभाग वाढत आहे.