शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

प्रवासाचा ई-पास मिळवण्यासाठी नागरिक वापरताहेत विविध ‘फंडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाहेरगावी प्रवास करता यावा यासाठी नागरिकांना ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे़ यात वैद्यकीय कारणासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाहेरगावी प्रवास करता यावा यासाठी नागरिकांना ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे़ यात वैद्यकीय कारणासाठी प्रवास करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य असून इतर कारणांना दु्य्यम स्थान देण्यात येत आहे़ परंतु या दुय्यम स्थानातील कारणांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पास मिळावा यासाठी विविध कारणे दिली जात आहेत़जिल्हाधिकारी कार्यालयांकडून आजअखेरीस ३८ हजार ५८१ जणांना ई-पास देऊन बाहेरगावी जाण्याचा परवाना देण्यात आला आहे़ तर ९ हजार ५७१ जणांचे अर्ज ठोस कारण नसल्याने नाकारण्यात आले आहेत़ वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आधारकार्ड असे दोनच कागदपत्रे आॅनलाईन अपलोड करण्याची सोय आहे़ प्रामुख्याने वैद्यकीय तपासणी, शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी जाणाºया नागरिकांना तातडीने ई-पास दिला जात आहे़ परंतू मुलासाठी मुलगी पाहवयास जाण्याचा कार्यक्रम, छोट्या स्वरूपात विवाह, साखरपुडा, नोकरी, व्यवसायानिमित्त रक्कम वसुली, शैक्षणिक कामे, नातेवाईक मयत झाल्यास भेटी यासह विविध कारणे देत नागरिक ई-पासची मागणी करत आहेत़ यात केवळ विवाह सोहळा हा एकच ठोस कार्यक्रम पुराव्यासह देता येतो़ यातून काही जण विवाह सोहळ्यांच्या नावाने पत्रिका तयार करुन प्रवास करत आहेत़ परजिल्ह्यात कागदपत्र पडताळणी वेळी या पत्रिका दाखवून वेळ मारुन नेण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहे़ शैक्षणिक कामांसाठी जाणाºयांना केवळ विद्यापीठ किंवा शिक्षण मंडळाच्या कामांसाठी परवाने दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे़वैद्यकीय कारण असल्यास तातडीने परवाना देण्यात येत असल्याने अनेकांनी बाहेरगावी तपासणी केलेल्या जुन्या फाईल्स काढून त्या प्रमाणपत्र म्हणून रिसबमिट करत परवाने मिळवल्याचेही समोर आले आहे़ तपासणीच्या नावाने गावी जात असल्याचे त्यांनी नमूदही केले होते़ शासनाने ई-पाससाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर आधार कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करण्याचीच सोय केली आहे़ यातून मग इतर कारणांनी प्रवास परवाने मिळवणे अडचणीचे होत असल्याचे दिसून आले आहे़ शासनाने संकेतस्थळावर तसा बदल करण्याची गरज आहे़