शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

नंदुरबार : बेरोजगारीमुळे अनेकांचे विवाह लांबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी नसल्याने छोकरी मिळत नसल्याने अनेक जण घरात बसून ...

नंदुरबार : बेरोजगारीमुळे अनेकांचे विवाह लांबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी नसल्याने छोकरी मिळत नसल्याने अनेक जण घरात बसून आहेत. छोटी-मोठी का, होईना नोकरीच हवी, या अपेक्षेने मुली विवाहासाठी होकार देत आहेत. यामुळे नोकरी नसलेल्यांचा यंदाही हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

यात कोरोना अधिक परिणामकारक ठरला असून ज्यांच्या हाती रोजगार होता तेही बेरोजगार झाले होते. यातून हातात पैसा नसल्याने विवाहासारखे निर्णय नाईलाजाने पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आले आहे. यातून कमी खर्चातील नोंदणी विवाहही कमी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

नंदुरबार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षभरात साधारण २० ते २२ विवाह नोंदणी पद्धतीने होतात.

कोरोनामुळे या संख्येत काही अंशी फरक पडला आहे. परंतू अनेक जण आजही नोंदणी विवाह करण्यास पसंती देत आहेत.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला आहे. सोबत मुली पाहण्याचे कार्यक्रमही थांबले आहेत. बेरोजगारीने अनेकांना चटका दिला असून दीड वर्षांपासून विवाह थांबले आहेत. मुली नोकरीची अपेक्षा करत असल्याने अनेकांचे विवाह यंदाही झालेले नाहीत.

- प्रवीण पाटील, नंदुरबार

आधीच खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतो, म्हणून लोक मुली देत नव्हते. कोरोनामुळे गत दीड वर्षात लाॅकडाऊनमुळे साठवलेला पैसा कामी आला. आता व्यवसाय चालत नाही. नव्याने सर्व काही सुरळीत करतो आहे. परंतू मुली देणारे नोकरी विचारतात, व्यवसायाला किंमत देत नाहीत.

-युवक, नंदुरबार.

मुला-मुलींचे वय वाढत असल्याने चिंता

सरकारी नोकरी नसल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील युवक मिळेल त्या नोकऱ्यांकडे वळत आहेत. कुशल आणि अकुशल अशा श्रेणीतील कामे करुन रोजगार कमावण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात नोकरी न मिळाल्यास लगतच्या गुजरात राज्यातील मोठ्या शहरांची वाट युवक धरु लागले आहेत. यात अनेकांचे वय हे लग्नाचे आहे. परंतु योग्य स्थळ मिळत नसल्याने त्यांचे विवाह लांबणीवर पडत आहेत. दुसरीकडे मुली शिक्षित असताना योग्य तो जोडीदार मिळत नसल्याने पालक चिंतेत आहेत. महागाईच्या काळात मुलीचा संसार चांगला व्हावा या अपेक्षेने पालक स्थळांचा शोध घेत आहेत. यासाठी प्रामुख्याने सोशल मीडियाचा आधार घेण्यावर काही जण भर देत आहेत.