शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मिरची उद्योगाला लॉकडाऊन अन् नैसर्गिक आपत्तीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

एकीकडे शेतकऱ्यांना यंदा फटका बसला असताना गेल्या वर्षातील लाॅकडाऊनपूर्वी नंदुरबार बाजार समितीत १ लाख ८९ हजार क्विंटल मिरचीची आवक ...

एकीकडे शेतकऱ्यांना यंदा फटका बसला असताना गेल्या वर्षातील लाॅकडाऊनपूर्वी नंदुरबार बाजार समितीत १ लाख ८९ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. ही मिरची व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर लाॅकडाऊन सुरू झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. मिरचीचा साठा केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मजूर नसल्याने उद्योजकांच्या समस्या वाढल्या होत्या.

मार्च २०२० पासून वाहतूक बंद असल्याने व्यापाऱ्यांना पावडर तयार करून निर्यात करणे जमत नव्हते. मार्च ते जून या चार महिन्यात या उद्योगात उलाढाल थांबल्याने १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उद्योजक देत आहेत. यातून पुढे मार्ग काढत मजुरांना आणून उद्योग सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यापासून मिरची उत्पादनांची वाहतूक सुरू झाली होती.

तूर्तास जिल्ह्यातील विविध भागासह गुजरात राज्यातील मिरची खरेदी करून पथारींवर सुकवण्याचा उद्योग जोरदारपणे सुरू आहे. सुकवलेली मिरची उद्योजक पुन्हा पावडर तयार करणाऱ्यांना विक्री करतात. परंतु मागील एक महिन्यात खराब झालेले हवामान आणि पाऊस यामुळे सुमारे एक कोटीपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यातून उत्पादन कमी आल्याने यंदा मिरची पूरक उद्योगांना जूनपर्यंत पुरेल एवढेच कच्चा माल रूपी उत्पादन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात या उद्योगासमोर कच्चा माल आणून प्रक्रिया करत उद्योग सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.