शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वालंबातील बालकांची अंगणवाडीत जाण्यासाठी नदीतील पाण्यातून कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नाही. त्यामुळे या पाड्यावरील लहान चिमुकल्या मुलांना व स्तनदा माता, गरोदर माताना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्यामध्ये येणाऱ्या नदीवर पुल नसल्याने नदीतूनच चौपलाईपाडाच्या अंगणवाडी केंद्रात जावे लागत आहे. या वेळी डोंगर दºयातील पाणी अचानक नदीला येवून धोकेदायक ठरू शकते तरी वालंबाच्या कारभारी पाड्यासाठी स्वतंत्र अंगणवाडी केंद्राला मंजुरी देवून ती अंगणवाडी सुरू करण्यात ची आवश्यकता आहे.अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नसल्याने येथील लहान मुलांना, स्तनदा माता व गरोदर माता, किशोर वयीन मुलीना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील चोपलाईपाडा अंगणवाडी केंद्रात जावे लागते. या कारभारी ते चोपलाईपाडा दरम्यान नदी येत असून, या नदीवर पुल नसल्याने नदीच्या पाणीमधून लहान मुले जात असताना डोंगराºयात जास्त पाऊस होवून अचानक नदीत पाणी वाढल्यास धोकेदायक ठरू शकते. तरी वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यास कारभारी पाड्यातील शून्य ते सहा वयोगटातील ३८ ते ४० लहान चिमुकल्यांना स्तनंदा व गरोदर माताना सोयीचे होणार आहे. तरी वालंबाच्या कारभारी येथे अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सातपुड्यातील दुर्गम अति दुर्गम भागातील गावांचे पाडे पाच ते सात किलोमीटर अंतरावर विस्तारलेले आहेत. अनेक ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी केंद्र नसल्याने तेथील बालकांना लगतच्या पाड्यातील शाळेत अथवा अंगणवाडीत जावे लागते. एका पाड्याहून दुसºया पाड्यावर जाण्यासाठी बहुतांश ठिकाणी रस्तेही नाही. पाय वाटेनेच डोंगराचा चढाव चढून अनेक ठिकाणी नदी नाले ओलांडून जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात ते धोकेदायक ठरते. त्यामुळे याबाबतचे योग्य सर्वेक्षण होवून दुर्घटना टाळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे.